कभी खुशी कभी गम हा चित्रपट पाहायला मिळणार मालिकेच्या रूपात, हा अभिनेता साकारणार मुख्य भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 10:29 IST2018-05-01T04:59:37+5:302018-05-01T10:29:37+5:30
कभी खुशी कभी गम या चित्रपटाची कथा आणि या चित्रपटातील सगळ्या कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. या चित्रपटात ...

कभी खुशी कभी गम हा चित्रपट पाहायला मिळणार मालिकेच्या रूपात, हा अभिनेता साकारणार मुख्य भूमिका
क ी खुशी कभी गम या चित्रपटाची कथा आणि या चित्रपटातील सगळ्या कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन, करिना कपूर, जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांसारखे कलाकार झळकले होते. कौटुंबिक मूल्याची शिकवण देणाऱ्या कभी खुशी कभी गम या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही. या चित्रपटाच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे.
करण जोहरने दिग्दर्शित केलेला कभी खुशी कभी गम प्रेक्षकांना आता मालिकेच्या रूपात पाहायला मिळणार आहे आणि या मालिकेची निर्मिती छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध निर्माती एकता कपूर करणार आहे. दिल ही तो है असे या मालिकेचे नाव असणार असून छोट्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध कलाकार या मालिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. रजत टोकस या मालिकेत मुख्य भूमिकेत असल्याची जोरदार चर्चा आहे. पण रजतला याबाबत एका वेबसाईटने विचारले असता अशा कोणत्याही मालिकेविषयी मला माहिती नसल्याचे त्याने सांगितले आहे.
कभी खुशी कभी गम या चित्रपटावर बनवल्या जाणाऱ्या मालिकेत रजतसोबतच बीजय आनंद, गीतांजली टिकेकर, अभिनव कपूर, रितू वीज यांच्या मुख्य भूमिका असणार असल्याची चर्चा आहे. एकता कपूरने या मालिकेबाबत मौन राखणेच पसंत केले आहे. या मालिकेबाबत लवकरच घोषणा केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. ही मालिका प्रेक्षकांना सोनी वाहिनीवर पाहायला मिळणार असल्याचे कळतेय. कभी खुशी कभी गम या चित्रपटाचे फॅन फॉलोविंग प्रचंड असल्याने प्रेक्षकांना या मालिकेविषयी चांगलीच उत्सुकता लागली आहे.
नागीन या मालिकेच्या दोन्ही सिझनला मिळालेल्या पसंतीनंतर या मालिकेचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेची निर्माती देखील एकता कपूर असून या मालिकेत रजत टोकस मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रजतचा नागीनमधील लुक त्याच्या आजवरच्या सगळ्या लुकपेक्षा पूर्णपणे वेगळा असून या लुकवर रजतने खूपच मेहनत घेतली आहे.
Also Read : रजत टोकसचे चंद्रनंदिनी या मालिकेतील तनू खानसोबत अफेअर?
करण जोहरने दिग्दर्शित केलेला कभी खुशी कभी गम प्रेक्षकांना आता मालिकेच्या रूपात पाहायला मिळणार आहे आणि या मालिकेची निर्मिती छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध निर्माती एकता कपूर करणार आहे. दिल ही तो है असे या मालिकेचे नाव असणार असून छोट्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध कलाकार या मालिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. रजत टोकस या मालिकेत मुख्य भूमिकेत असल्याची जोरदार चर्चा आहे. पण रजतला याबाबत एका वेबसाईटने विचारले असता अशा कोणत्याही मालिकेविषयी मला माहिती नसल्याचे त्याने सांगितले आहे.
कभी खुशी कभी गम या चित्रपटावर बनवल्या जाणाऱ्या मालिकेत रजतसोबतच बीजय आनंद, गीतांजली टिकेकर, अभिनव कपूर, रितू वीज यांच्या मुख्य भूमिका असणार असल्याची चर्चा आहे. एकता कपूरने या मालिकेबाबत मौन राखणेच पसंत केले आहे. या मालिकेबाबत लवकरच घोषणा केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. ही मालिका प्रेक्षकांना सोनी वाहिनीवर पाहायला मिळणार असल्याचे कळतेय. कभी खुशी कभी गम या चित्रपटाचे फॅन फॉलोविंग प्रचंड असल्याने प्रेक्षकांना या मालिकेविषयी चांगलीच उत्सुकता लागली आहे.
नागीन या मालिकेच्या दोन्ही सिझनला मिळालेल्या पसंतीनंतर या मालिकेचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेची निर्माती देखील एकता कपूर असून या मालिकेत रजत टोकस मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रजतचा नागीनमधील लुक त्याच्या आजवरच्या सगळ्या लुकपेक्षा पूर्णपणे वेगळा असून या लुकवर रजतने खूपच मेहनत घेतली आहे.
Also Read : रजत टोकसचे चंद्रनंदिनी या मालिकेतील तनू खानसोबत अफेअर?