रिंकू धवनने सांगितलं मराठमोळ्या अभिनेत्यासोबत घटस्फोट घेण्यामागचं कारण; म्हणाली, 'तो घरी आला की थेट...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 05:52 PM2024-01-10T17:52:30+5:302024-01-10T17:53:31+5:30

Rinku dhawan: रिंकूने मराठमोळा अभिनेता किरण करमरकर याच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र, लग्नाच्या १५ वर्षानंतर ही जोडी विभक्त झाली.

rinku-dhawan-talk-about-ex-husband-kiran-karmakar-divorce | रिंकू धवनने सांगितलं मराठमोळ्या अभिनेत्यासोबत घटस्फोट घेण्यामागचं कारण; म्हणाली, 'तो घरी आला की थेट...'

रिंकू धवनने सांगितलं मराठमोळ्या अभिनेत्यासोबत घटस्फोट घेण्यामागचं कारण; म्हणाली, 'तो घरी आला की थेट...'

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस (bigg boss). हा कार्यक्रम कायम विविध टास्कमुळे चर्चेत येत असतो. मात्र, या शोच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदाचं पर्व टास्कपेक्षा सेलिब्रिटींच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. हा शो सुरु झाल्यापासून अंकिता लोखंडे-विकी जैन (ankita lokhande- vicky jain) लाइमलाइटमध्ये आहेत. यामध्येच आता नुकतीच या शोमधून बाहेर पडलेली रिंकू धवन हिने तिच्या वैवाहिक जीवनावर भाष्य केलं आहे.

सध्या बिग बॉसचं 17  वं पर्व सुरु आहे. या पर्वात अभिनेत्री रिंकू धवन (Rinku Dhawan) सुद्धा सहभागी झाली होती. रिंकूने मराठमोळा अभिनेता किरण करमरकर (kiran karmarkar) याच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. ही जोडी कायदेशीररित्या विभक्त झाली. त्यानंतर रिंकूने आता तिच्या घटस्फोटावर भाष्य केलं आहे. सोबतच किरणपासून ती विभक्त का झाली यामागचं कारणही तिने सांगितलं आहे.

बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर रिंकूने 'टेलीचक्कर'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने किरण आणि तिच्या नात्यात कशामुळे फूट पडली, ते का विभक्त झाले या मागची कारणं सांगितली.

"मला किरणसोबत बोलायचं होतं. पण, त्याने माझ्याशी बोलणं सोडून दिलं होतं. मला त्याला सांगावसं वाटायचं की माझा दिवस कसा गेला, दिवसभर काय झालं. पण, तो घरी आला की थेट सरळ झोपायला जायचा. याचमुळे आमच्या नात्यात अंतर येऊ लागलं आणि मला सतत एकटेपणा जाणवू लागला. याच गोष्टींमुळे मी अशा व्यक्तीच्या जवळ गेले जो माझ्या भावना समजू शकत होता. माझं म्हणणं ऐकत होता. पण, ते फक्त इमोशनल कनेक्शन होतं", असं रिंकू म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मी त्याला सगळं काही सांगायचे आणि तो ऐकून घ्यायचा. मी फक्त माझ्या मुलाकडे पाहून किरणसोबतच्या नात्यात होते. पण, एकदा किरणने माझे इमेल पाहिले ज्यात मी त्या व्यक्तीला माझ्या मनातल्या गोष्टी शेअर केल्या होत्या. हा मेल पाहिल्यावर किरणने खूप गोंधळ निर्माण केला होता. या प्रकारानंतर मी त्याच बिल्डिंगमध्ये एका दुसऱ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले. ज्यामुळे मी माझ्या मुलाच्या जवळ राहू शकेन. नंतर मग आम्ही कायदेशीररित्या स्वतंत्र झालो. एका लहान मुलाला त्याच्या आई-वडिलांना असं विभक्त होताना पाहणं फार कठीण असतं."

दरम्यान, रिंकू आणि किरण यांनी जवळपास १५ वर्ष संसार केला. त्यानंतर ते विभक्त झाले. रिंकू धवन आणि किरण करमरकर एकता कपूरच्या एका मालिकेत काम करताना प्रेमात पडले. त्या मालिकेत दोघं बहीण भावाच्या भूमिकेत होते. नंतर ते लग्नबंधनातही अडकले. मात्र काही वादविवादामुळे लग्नाच्या १५ वर्षांनी २०१७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. 

Web Title: rinku-dhawan-talk-about-ex-husband-kiran-karmakar-divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.