या कारणामुळे कविता वैदवर ख-या आयुष्यात 'ती' मी नव्हे ही गोष्ट सांगण्याची आली वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 15:04 IST2017-12-21T09:34:43+5:302017-12-21T15:04:43+5:30

छोट्या पडद्यावरील इक्यावन मालिकेमध्ये लीलाची भूमिका साकारणारी कविता वैद छोट्‌या पडद्यावरील सर्वांत आवडती व्यक्तिरेखा बनत आहे. ह्या व्यक्तिरेखेला थोड्‌या ...

For this reason, the time has come to tell the story that 'I am not' in the life of poetry. | या कारणामुळे कविता वैदवर ख-या आयुष्यात 'ती' मी नव्हे ही गोष्ट सांगण्याची आली वेळ!

या कारणामुळे कविता वैदवर ख-या आयुष्यात 'ती' मी नव्हे ही गोष्ट सांगण्याची आली वेळ!

ट्या पडद्यावरील इक्यावन मालिकेमध्ये लीलाची भूमिका साकारणारी कविता वैद छोट्‌या पडद्यावरील सर्वांत आवडती व्यक्तिरेखा बनत आहे. ह्या व्यक्तिरेखेला थोड्‌या खलनायकी छटा असून ती सत्या नमिष तनेजाची आजी असून सुशील प्राची टेहलान आणि पारेख परिवारामध्ये समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करते.लीला आपल्या परिवाराबाबत अतिशय प्रोटेक्टिव्ह असून तिचे नातू नमिष आणि विशु यांचा तिच्यावर मोठा प्रभाव आहे.दुसऱ्या बाजूला तिला पारेख परिवारापासून बदला घ्यायचा असून त्यांना उध्वस्त करण्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,“कविता वैद लीला ही भूमिका अतिशय सुंदर पद्धतीने साकारतात आणि रसिकांना अगदी थक्क करून सोडतात. वास्तवात त्या आपल्या व्यक्तिरेखेसारख्या अजिबात नसून खूपच साध्या,प्रेमळ आणि हव्याहव्याशा वाटतील अशा आहेत.”आपली व्यक्तिरेखा आणि स्वतःमध्ये असलेल्या साम्य याविषयी कविता म्हणाल्या,“मी वास्तवात लीलासारखी अजिबातच नाही.खरं तर मला तिच्या विक्षिप्त विचारांमुळे काही वेळा तिची भीतीच वाटते.माझ्या स्वतःच्या मनात तिच्यासारखे विचार येऊच शकत नाहीत.”व्यक्तिरेखाच्या बिल्कुल ऑपोझिट मी माझ्या ख-या आयुष्यात आहे.
 
इक्यावन ही हिंदी मालिका नवनवीन ट्विस्ट आणि टर्नमुळे रोमांचक आणि रंजक बनत चालली आहे.घराघरात प्रत्येकाला ही मालिका चांगलीच भावते आहे.अल्पावधीतच या मालिकेने रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे.ही मालिका सुरू होवून अगदी काहीच दिवस झाले असले तरी मालिकेत सगळ्या कलाकारांचे प्रत्येकासोबत चांगले नाते निर्माण झाले आहे. यामध्ये सगळ्यात आधी नमिष तनेजा आणि कविता वैद यांचा उल्लेख करावा लागेल.या मालिकेत आजी लीलाची भूमिका अभिनेत्री कविता वैद्य साकारत आहेत. तर त्यांच्या नातवाच्या म्हणजेच सत्याच्या भूमिकेत नमिष तनेजा पाहायला मिळतो आहे.नमिष तनेजासोनत कविता वैद यांची केमिस्ट्री सध्या रसिकांना चांगलीच भावते आहे. या दोघांचे ऑनस्क्रीन आजी आणि नातवाचं नातं रसिकांना भावतं आहे.दोघांमधील नातं हे रिअल आजी आणि नातवासारखंच आहे.इक्यावनच्या सेटवर एक कुटुंब मिळाल्याची भावना कविता वैद्य यांनी व्यक्त केली आहे. नमिष तर माझ्या खऱ्या नातवासारखाच आहे असंही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: For this reason, the time has come to tell the story that 'I am not' in the life of poetry.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.