महाराष्ट्र बंदमुळे या मालिकांचे चित्रीकरण करावे लागले रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 16:11 IST2018-01-03T10:41:22+5:302018-01-03T16:11:22+5:30

भीमा कोरेगाव घटनेच्या निषधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील ...

The owners of the bandh were to be shot due to the Maharashtra ban | महाराष्ट्र बंदमुळे या मालिकांचे चित्रीकरण करावे लागले रद्द

महाराष्ट्र बंदमुळे या मालिकांचे चित्रीकरण करावे लागले रद्द

मा कोरेगाव घटनेच्या निषधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनमधील चित्रपटांचे शो रद्द करण्यात आले आहेत. तर, शहरातील अनेक चित्रपटगृहातील मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनमधील चित्रपटांचे शो रद्द करण्यात आले आहेत. याचबरोबर, दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात होणारा ढाई अक्षर प्रेम के या नाटकाचा शो सुद्धा रद्द करण्यात आला आहे.
पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदने राज्यातील अनेक भागात हिंसक वळण घेतले आहे. मुंबईत सुद्धा काही ठिकठिकाणी हिंसक आंदोलने सुरू आहेत. येथील फिल्मसिटीत रस्ते आंदोलनकर्त्यांनी अडवल्याने हिंदी मालिकांचे शूटिंगही बंद करण्यात आले आहे. ये उन दिनो की बात है, विघ्नहर्ता गणेश, रिश्ता क्या कहलात है, तारक मेहता का उल्टा चष्मा, पिया अलबेला, हासिल यांसारख्या मालिकांचे चित्रीकरण रद्द करण्यात आले आहे. याविषयी साम दाम या मालिकेत काम करणारी सोनल वेंगुर्लेकर सांगते, आम्हाला चित्रीकरणासाठी साडे आठ वाजता पोहोचायचे होते. पण फिल्म सिटीच्या बाहेर गोंधळ सुरू होता. आमची गाडी थोडी देखील पुढे जाऊ शकत नव्हती. आम्हाला ते सतत धमकी देत होते. त्यामुळे शेवटी चित्रीकरण रद्द करण्याचे आमच्या टीमने ठरवले. पण घरी परतताना रस्त्यात प्रचंड ट्रॅफिक होते. मला घरी पोहोचायला जवळजवळ अडीज तास लागले. 
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील शिवांगी जोशी सांगते, मी चित्रीकरणासाठी घरातून निघाले होते. पण अर्ध्या रस्त्यात आल्यावर आमच्या मालिकेचे चित्रीकरण रद्द झाल्याचे मला कळले. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे निर्माते असित मोदी सांगतात, मुंबईत बंद पुकारण्यात आला आहे. त्याचा माझ्या कलाकारांना आणि माझ्या टेक्निशियन टीमला त्रास होऊ नये यासाठी मी चित्रीकरणच रद्द करण्याचा निर्णय घेतला. जीत गयी तो पिया मोरे आणि जी जी माँ या मालिकेचे निर्माते जय मेहता सांगतात, आम्ही अगदी सकाळीच चित्रीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक असल्याने आमची टीम पोहोचू शकणार नाही याची आम्हाला कल्पना होती. आमच्यासाठी आमच्या टीमची सुरक्षा ही सगळ्यात महत्त्वाची आहे. 

Web Title: The owners of the bandh were to be shot due to the Maharashtra ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.