OMG! सुनील ग्रोव्हरने वाढवले त्याचे मानधन... एका एपिसोडसाठी घेतोय तब्बल इतके लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 14:36 IST2017-07-26T09:06:49+5:302017-07-26T14:36:49+5:30
सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा यांच्यात झालेल्या वादामुळे सुनीलने द कपिल शर्मा शोला रामराम ठोकला. कपिल शर्मा आणि त्याची ...
.jpg)
OMG! सुनील ग्रोव्हरने वाढवले त्याचे मानधन... एका एपिसोडसाठी घेतोय तब्बल इतके लाख
स नील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा यांच्यात झालेल्या वादामुळे सुनीलने द कपिल शर्मा शोला रामराम ठोकला. कपिल शर्मा आणि त्याची टीम एका कार्यक्रमासाठी सिडनीला गेले होते. तिथून परतत असताना कपिल शर्माने दारूच्या नशेत सुनीलला शिव्या घातल्या. तसेच त्याच्यावर हात उगारला असे म्हटले जाते. विमानात घडलेल्या या घटनेनंतर सुनीलने हा कार्यक्रम सोडण्याचा
निर्णय घेतला. सुनीलने कार्यक्रम सोडल्यानंतर त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. सुनीलसोबतच अली असगरने देखील हा कार्य़क्रम सोडला. याचा परिणाम द कपिल शर्मा शोच्या टिआरपीवर झाला आहे. गेल्या काही दिवसांत या कार्यक्रमाचा टिआरपी दिवसेंदिवस ढासळतच चालला आहे तर दुसरीकडे हा कार्यक्रम सोडूनही सुनीलच्या लोकप्रियतेत काहीच फरक पडलेला नाही.
द कपिल शर्मा सोडल्यानंतर सुनील ग्रोव्हरला अनेक कार्यक्रमांच्या ऑफर्स येत आहेत. पण तो कोणत्याही कार्यक्रमाचा भाग होण्यापेक्षा कार्यक्रमांमध्ये पाहुणा कलाकार म्हणून येणे पसंत करत आहे. सुनीलने द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम सोडल्यानंतर त्याचे मानधन देखील वाढवले असल्याचे म्हटले जात आहे. त्याने त्याचे मानधन दुप्पट केले असून निर्मातेदेखील त्याला तितकी रक्कम देण्यास तयार आहेत. पूर्वी सुनील ग्रोव्हर एखाद्या कार्यक्रमात येण्यासाठी एका भागाचे सात ते आठ लाख रुपये घेत असे. पण आता तो एका भागासाठी १४ लाख इतके मानधन घेत असल्याचे म्हटले जात आहे.
द कपिल शर्मा शोचे गेल्या काही आठवड्यांपासून जुनेच भाग दाखवण्यात येत आहेत. कपिल आजारी असल्याने त्याच्या टीमला चित्रीकरण करणे कठीण जात आहे. त्यामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटले जात होते. पण याविषयी किकू शारदा सांगतो, द कपिल शर्मा शोच्या बाबतीत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. आम्ही पुढच्या भागाचे चित्रीकरण करायला सुरुवात देखील केली आहे.
Also Read : या कारणांमुळे अली असगरने सोडला द कपिल शर्मा शो
निर्णय घेतला. सुनीलने कार्यक्रम सोडल्यानंतर त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. सुनीलसोबतच अली असगरने देखील हा कार्य़क्रम सोडला. याचा परिणाम द कपिल शर्मा शोच्या टिआरपीवर झाला आहे. गेल्या काही दिवसांत या कार्यक्रमाचा टिआरपी दिवसेंदिवस ढासळतच चालला आहे तर दुसरीकडे हा कार्यक्रम सोडूनही सुनीलच्या लोकप्रियतेत काहीच फरक पडलेला नाही.
द कपिल शर्मा सोडल्यानंतर सुनील ग्रोव्हरला अनेक कार्यक्रमांच्या ऑफर्स येत आहेत. पण तो कोणत्याही कार्यक्रमाचा भाग होण्यापेक्षा कार्यक्रमांमध्ये पाहुणा कलाकार म्हणून येणे पसंत करत आहे. सुनीलने द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम सोडल्यानंतर त्याचे मानधन देखील वाढवले असल्याचे म्हटले जात आहे. त्याने त्याचे मानधन दुप्पट केले असून निर्मातेदेखील त्याला तितकी रक्कम देण्यास तयार आहेत. पूर्वी सुनील ग्रोव्हर एखाद्या कार्यक्रमात येण्यासाठी एका भागाचे सात ते आठ लाख रुपये घेत असे. पण आता तो एका भागासाठी १४ लाख इतके मानधन घेत असल्याचे म्हटले जात आहे.
द कपिल शर्मा शोचे गेल्या काही आठवड्यांपासून जुनेच भाग दाखवण्यात येत आहेत. कपिल आजारी असल्याने त्याच्या टीमला चित्रीकरण करणे कठीण जात आहे. त्यामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटले जात होते. पण याविषयी किकू शारदा सांगतो, द कपिल शर्मा शोच्या बाबतीत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. आम्ही पुढच्या भागाचे चित्रीकरण करायला सुरुवात देखील केली आहे.
Also Read : या कारणांमुळे अली असगरने सोडला द कपिल शर्मा शो