लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 14:03 IST2025-06-09T14:03:07+5:302025-06-09T14:03:39+5:30
मराठी तसंच हिंदीतही लोकप्रिय असलेल्या अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni)सध्या चर्चेत आहेत.

लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
मराठी तसंच हिंदीतही लोकप्रिय असलेल्या अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni)सध्या चर्चेत आहेत. अलिकडेच त्यांनी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या आहेत आणि तिथे केलेले त्यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीत लग्नानंतर त्यांना बिल्डिंगमध्ये आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले आहे.
उषा नाडकर्णी यांना सुमन म्युझिक या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आनंदी राहणं म्हणजे काय?, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उषा नाडकर्णी म्हणाल्या की, प्रत्येकाला वाटत असतं मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. मला ते पाहिजे. झोपडपट्टीत राहणाऱ्यांना वाटतं मला बिल्डिंगमध्ये राहायला जायला पाहिजे. तर मला तिथे आनंद मिळेल.
उषा नाडकर्णी म्हणाल्या...
उषा नाडकर्णी पुढे म्हणाल्या की, दहा बाय दहाच्या खोलीत राहत होतो आम्ही मग आतली खोली आणि बाहेरची खोली मग २ बीएचके तिथून माझं लग्न झालं आणि मी वाकोल्याला घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला आले. मी कधी त्या तिथे कोणालाही घरी बोलवलं नाही. असा मला रात्रीचा दम नाही लागायचा. पण अस्वस्थ होऊन मी उठून बसायचे मग मी तोंडात पंप मार कारण पंप माझ्या बाजूलाच असतो झोपताना.त्याच्यानी काही होत नव्हतं. मग कधीतरी सकाळी सकाळी मला झोप लागायची. आंघोळ केली तर अंग पुसता यायचं नाही. वाकताही यायचं नाही. मी अशी वाकूनच घरामध्ये होती.
वर्कफ्रंट
अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी हिंदी आणि मराठी सिनेइंडस्ट्रीत काम केले आहे. गेल्या ८० वर्षांपासून त्या इंडस्ट्रीत सक्रीय आहेत. त्यांनी 'वास्तव', 'कृष्णा कॉटेज', 'वन टू थ्री', 'आर राजकुमार' या हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे. अक्षय कुमारच्या 'रुस्तम'मध्येही त्या झळकल्या आहेत. तसेच त्या बिग बॉस मराठीमध्येही पाहायला मिळाल्या.