सर्दी-खोकला जातच नव्हता, फुप्फुसांना इन्फेक्शन; 'मुरांबा' फेम अभिनेत्रीला झालेला गंभीर आजार, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:24 IST2025-06-11T16:24:15+5:302025-06-11T16:24:59+5:30
तब्येतीच्या कारणास्तव शाश्वतीने 'मुरांबा' मालिकेतून एक्झिट घेत काही काळ ब्रेक घेतला होता. सध्या ती 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

सर्दी-खोकला जातच नव्हता, फुप्फुसांना इन्फेक्शन; 'मुरांबा' फेम अभिनेत्रीला झालेला गंभीर आजार, म्हणाली...
'मुरांबा' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील सगळ्याच पात्रांवर प्रेक्षक प्रेम करतात. 'मुरांबा'मध्ये आरती ही भूमिका साकारणारी अभिनेत्री शाश्वती पिंपळकर हिने अचानक मालिकेतून एक्झिट घेतली होती. आता अभिनेत्रीने मालिकेतून एक्झिट घेण्याचं खरं कारण सांगितलं आहे. तब्येतीच्या कारणास्तव शाश्वतीने 'मुरांबा' मालिकेतून एक्झिट घेत काही काळ ब्रेक घेतला होता. सध्या ती 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
शाश्वतीने नुकतीच हंच मीडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, "मुरांबामध्ये मी साकारलेल्या आरती या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. आता मी सध्या 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील भूमिकेचं प्रेक्षक कौतुक करतात. पण, अजूनही मुरांबामध्ये आरतीला मिस करत असल्याचं सांगतात. कारण, ती भूमिका छोटी असली तरी प्रभावी होती. मी मुरांबा मालिका करत असतानाच मला नॉर्मल सर्दी खोकला सुरू होता. पण, माझ्या भावाचं लग्नाची गडबड घरी सुरू होती आणि माझं शूटिंगही सुरू होतं. यामध्ये माझं दुर्लक्ष झालं".
पुढे ती म्हणाली, "२-३ महिने माझा सर्दी खोकला जातच नव्हता. जेव्हा माझ्या लक्षात आलं तोपर्यंत माझ्या फुप्फुसांना बऱ्यापैकी इन्फेक्शन झालं होतं. हे इन्फेशन इतकं होतं की मला अस्थमा होऊ शकला असता. खूप दिवस सर्दी खोकला राहिला तर तुमच्या फुप्फुसांची काम करण्याची क्षमता कमी कमी होत जाते. जेव्हा मी मुरांबा मालिका सोडली तेव्हा माझी परिस्थिती अशी होती की ३-४ पायऱ्या चढल्यानंतर मला थांबायला लागायचं. म्हणून मग डॉक्टरांच्या सल्ल्याने मी ब्रेक घ्यायचं ठरवलं. मुरांबा सोडल्यानंतरही मला खूप शोच्या ऑफर आल्या होत्या. नाटकासाठीही विचारलं गेलं होतं. पण, मी ब्रेक घेतला. तो एक-दीड वर्षांचा काळ खूप कठीण होता".