मुकेशने घेतला प्रेक्षकांचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 13:19 IST2016-06-24T07:49:20+5:302016-06-24T13:19:20+5:30
वारीस ही मालिका अतिशय गंभीर विषयावर भाष्य करते. आपल्या समाजात नेहमीच मुला-मुलींमध्ये भेदभाव केला जातो. या मालिकेतही हीच गोष्ट ...

मुकेशने घेतला प्रेक्षकांचा निरोप
व रीस ही मालिका अतिशय गंभीर विषयावर भाष्य करते. आपल्या समाजात नेहमीच मुला-मुलींमध्ये भेदभाव केला जातो. या मालिकेतही हीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या मुलीला मुलाप्रमाणे वाढवणाऱ्या आईची ही कथा प्रेक्षकांना खूप आवडत आहे. ही मालिका लवकरच सात वर्षांचा लीप घेणार आहे. लीपनंतर अभिनेते मुकेश खन्ना प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. लीपनंतर मुकेश खन्ना साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचे निधन झाल्याचे दाखवण्यात येणार आहे. सामाजिक प्रश्नावर भाष्य करणाऱया या मालिकेत काम करण्याचा अनुभव खूप चांगला असल्याचे मुकेश सांगतात.