प्रत्युषाच्या मृत्यूनंतर 7 वर्षांनी बॉयफ्रेंड राहुल राजने व्यक्त केलं दु:ख, म्हणाला, 'तिचा मृत्यू...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 02:04 PM2023-04-09T14:04:42+5:302023-04-09T14:07:21+5:30

राहुल राज याने सलोनी शर्मासोबत लग्न केलं असून तिने यावर्षीच मुलीला जन्म दिला आहे.

late pratyusha banerjee boyfriend rahul raj singh claims that vikas gupta destroyed his career | प्रत्युषाच्या मृत्यूनंतर 7 वर्षांनी बॉयफ्रेंड राहुल राजने व्यक्त केलं दु:ख, म्हणाला, 'तिचा मृत्यू...'

प्रत्युषाच्या मृत्यूनंतर 7 वर्षांनी बॉयफ्रेंड राहुल राजने व्यक्त केलं दु:ख, म्हणाला, 'तिचा मृत्यू...'

googlenewsNext

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'बालिका वधू' फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी (Pratyusha Banerjee) हिने 2016 साली गळफास घेत आत्महत्या केली. 'बालिका वधू' मालिकेत तिने मोठेपणीच्या आनंदीची भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. काही वर्षांनी प्रत्युषाने असं पाऊल उचलल्यावर सर्वांनाच धक्का बसला. प्रत्युषा आणि तिचा बॉयफ्रेंड राहुल राज (Rahul Raj) यांच्यात वाद झाला म्हणूनच प्रत्युषाने आत्महत्या केली असं बोललं गेलं. आता प्रत्युषाच्या निधनानंतर ७ वर्षांनी राहुल राजने आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.

राहुल राजने आज तकला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. अनेक वर्षांनंतर राहुल एका प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. प्रत्युषाच्या मृत्यूनंतर करिअर उद्धवस्त झालं असं तो म्हणाला. तसंच विकास गुप्ताने त्याला  'लॉकअप' सारख्या अनेक प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवला. आता अंकित तिवारीचा म्युझिक अल्बम 'बेपरवाह 2' मध्ये राहुल दिसणार आहे. यावेळी दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला,'प्रत्युषाच्या मृत्यूनंतर माझं आयुष्यच बदलून गेलंय. मी खूप जास्त परेशान आणि डिस्टर्ब झालो होतो. जगण्याची आशाच संपली होती. जेव्हा त्यातून बाहेर आलो तेव्हा कामाबद्दल विचार केला. पण कामही मिळत नव्हते. खूप स्ट्रगल केला. आता कुठे मला हा अल्बम मिळाला आहे.'

राहुल पुढे म्हणाला, 'मला लॉकअप 1 ऑफर करण्यात आलं होतं. पण विकास गुप्ताने माझा पत्ता कट केला. त्याच्या दबावामुळे तो शो माझ्या हातातून गेला. केवळ हाच नाही तर अशा अनेक शोजमधून त्याच्यामुळे मला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय.'

पालकांच्या कर्जामुळेच तिने आत्महत्या केली

राहुलने यावेळी एक मोठा खुलासाही केला. तो म्हणाला,'ज्या दिवशी प्रत्युषाचा मृत्यू झाला त्याच्या तीन दिवसांपर्यंत मी शुद्धीतच नव्हतो. झोपेच्या गोळ्याही कामी येत नव्हत्या. काही बोलू शकत नव्हतो. मी तिची हत्या केली असा आरोप माझ्यावर लावण्यात आला. पण असं का करेन मी. आम्ही आदल्याच रात्री पार्टी केली होती. आमच्यात सगळं काही ठीक होतं. उलट ती तिच्या आईवडिलांवर असलेल्या कर्जामुळे त्रासली होती. तरी मी तिला म्हटलं होतं की आपण मिळून काहीतरी मार्ग काढू.'

राहुल राज याने सलोनी शर्मासोबत लग्न केलं असून दोघांना एक मुलगीही आहे.  प्रत्युषाच्या मृत्यूनंतर 2 वर्षांनी 2018 मध्ये त्याने लग्नगाठ बांधली. तर यावर्षीच जानेवारी महिन्यात त्याला कन्यारत्न प्राप्त झाले.

Web Title: late pratyusha banerjee boyfriend rahul raj singh claims that vikas gupta destroyed his career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.