"वन लास्ट टाईम...", मालिकेला निरोप देताना भावुक झाली गिरिजा प्रभू, जुने क्षण केले शेअर; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 13:33 IST2026-01-04T13:30:44+5:302026-01-04T13:33:01+5:30

'कोण होतीस तू...'ला निरोप देताना गिरिजा प्रभू झाली भावुक! पडद्यामागील जुने क्षण शेअर करत म्हणाली- "प्रेक्षकांचं प्रेम अन्..."

girija prabhu got emotional while bidding farewell to the kon hotis tu kay jhalis tu serial shared old moments video viral | "वन लास्ट टाईम...", मालिकेला निरोप देताना भावुक झाली गिरिजा प्रभू, जुने क्षण केले शेअर; म्हणाली...

"वन लास्ट टाईम...", मालिकेला निरोप देताना भावुक झाली गिरिजा प्रभू, जुने क्षण केले शेअर; म्हणाली...

Girija Prabhu Emotional Post: छोट्या पडद्यावरील मालिकांचा चाहतावर्ग हा फार मोठा आहे. त्यातील कलाकारही प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. आपल्या या आवडत्या मालिका संपल्या की प्रेक्षकांना पुढचे काही दिवस वाईट वाटत राहतं. दररोज मालिकेत दिसणारे चेहरे, त्याच्या आयुष्यात येणारे चांगले-वाईट प्रसंग या सगळ्यांनी ते अगदी समरुप होताना दिसतात.प्रेक्षकांबरोबर मालिकेत काम करणारे कलाकार देखील निरोप देताना भावुक होत असतात. अशाच एक लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ही मालिका संपताच मुख्य भूमिका साकारणारी नायिका भावुक झाली आहे. या मालिकेचं नाव कोण होतीस तू काय झालीस तू आहे. 


'कोण होतीस तू काय झालीस तू ही' मालिका २८ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेमध्ये अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी पाहायला मिळाली. कावेरी आणि यश यांची अनोखी लव्हस्टोरी या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मात्र, या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिका संपल्यानंतर मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री गिरिजा प्रभूने भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

गिरिजा प्रभूने सोशल मीडियावर तिचा मालिकेतील प्रवास व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे. गिरीजाने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये म्हटलंय, मायबाप रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार...असंच तुमचं प्रेम आणि आणि आशीर्वाद कायम सोबत असूद्या... अशा मोजक्याच शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हॅशटॅग #onelasttime, #konhotistukayzalistu तसेच  #kaveri  असे टॅंग्स तिने या व्हिडीओला दिले आहेत. 

जवळपास आठ महिने प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. काल ४ जानेवारीला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला. त्यामुळे चाहते नाराज आहेत. 

Web Title : गिरिजा प्रभु ने भावुक यादों के साथ सीरियल को अलविदा कहा।

Web Summary : अभिनेत्री गिरिजा प्रभु ने अपने लोकप्रिय टीवी सीरियल 'कौन होतीस तू काय झालीस तू' के समापन पर एक भावुक पोस्ट साझा किया। अपनी अनूठी प्रेम कहानी के लिए पसंद किए जाने वाले इस शो ने आठ महीने तक दर्शकों का मनोरंजन करने के बाद अलविदा कह दिया। प्रभु ने प्रशंसकों को उनके समर्थन के लिए धन्यवाद दिया।

Web Title : Girija Prabhu bids farewell to series with emotional memories.

Web Summary : Actress Girija Prabhu shared a heartfelt post as her popular TV series 'Kon Hotis Tu Kay Zalis Tu' concluded. The show, loved for its unique love story, ended after entertaining viewers for eight months. Prabhu thanked fans for their support.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.