'रामायण'मधील शूर्पणखा आठवतेय का? रावणाची बहीण बनण्यासाठी मिळालेलं फक्त इतकं मानधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 18:15 IST2025-06-03T18:14:49+5:302025-06-03T18:15:16+5:30
टेलिव्हिजनच्या इतिहासातील रामायण (Tv Show Ramayana) सर्वात लोकप्रिय शो आहे. ८० च्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या या पौराणिक मालिकेतील कलाकार आजही चर्चेत येत असतात.

'रामायण'मधील शूर्पणखा आठवतेय का? रावणाची बहीण बनण्यासाठी मिळालेलं फक्त इतकं मानधन
टेलिव्हिजनच्या इतिहासातील रामायण (Tv Show Ramayana) सर्वात लोकप्रिय शो आहे. ८० च्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या या पौराणिक मालिकेतील कलाकारांची अजूनही चर्चा आहे. राम, रावण आणि सीता व्यतिरिक्त अशी अनेक पात्रे होती, जी वेगवेगळ्या कलाकारांनी अतिशय उत्तम पद्धतीने पडद्यावर सादर केली होती. त्यापैकी एक म्हणजे शूर्पणखा ही व्यक्तिरेखा. ही भूमिका अभिनेत्री रेणू धारीवाल यांनी साकारली आहे.
रामानंद सागर यांची रामायण मालिका अजूनही चाहत्यांमध्ये लोकप्रिय मानली जाते. दूरदर्शनवर नसली तरी ती यूट्यूबवर पाहायला लोकांना आवडते. या मालिकेप्रमाणेच, त्यातील कलाकारही अप्रतिम आहेत आणि प्रत्येक पात्राच्या निवडीमागे एक रंजक कहाणी आहे. काही वर्षांपूर्वी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत रेणू धारीवाल यांनी रामायणात शूर्पणखा ही भूमिका साकारण्यामागची स्टोरी सांगितली होती.
रेणू धारीवाल यांची अशी लागली वर्णी
रेणू धारीवाल म्हणाल्या होत्या की, मी एक थिएटर कलाकार आहे. जेव्हा मला कळले की रामानंद सागर रामायण बनवत आहेत, तेव्हा मी ऑडिशनसाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. तेव्हा मला माहित नव्हते की, २२ वर्षांची असताना मला शूर्पणखा ही भूमिका मिळेल. त्यांनी मला सांगितले की, उर्वरित कलाकार फायनल झाले आहेत, फक्त रावणाच्या बहिणीची भूमिका शिल्लक आहे. मी ते मान्य केली आणि त्यांनी मला मोठ्याने हसण्यास सांगितले, माझे हास्य चांगले नाही, मी हसताच, रामानंद सागर यांनी मला असे हसताना पाहिले आणि त्यांनी मला शूर्पणखा बनवण्याचा निर्णय घेतला. या भूमिकेसाठी मला ३० हजार रुपयेही देण्यात आले होते, जे त्या काळाच्या मानाने खूप जास्त होते.
आता कुठे आहेत रामायणातील शूर्पणखा?
रामायणातील शूर्पणखा म्हणजेच रेणू धारीवाल सध्या त्यांचे पती आणि मुलासोबत मुंबईतील अंधेरी येथील एका सोसायटीत राहतात. रामायण मालिका केल्यानंतर त्यांना खूप लोकप्रियता मिळाली, परंतु त्यांनी अभिनयात फार काम केले नाही. सध्या त्या राजकारणाच्या क्षेत्रात सक्रिय आहेत आणि काँग्रेस पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करतात.