'विक्रम-बेताल' मालिकेतील बेताल आठवतोय का?, २००० साली अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 18:30 IST2025-05-17T18:29:29+5:302025-05-17T18:30:08+5:30

बेतालची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीत १५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते.

Do you remember Betal from the series 'Vikram-Betal'? The actor said goodbye to the world in 2000. | 'विक्रम-बेताल' मालिकेतील बेताल आठवतोय का?, २००० साली अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप

'विक्रम-बेताल' मालिकेतील बेताल आठवतोय का?, २००० साली अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप

बॉलिवूडच्या जगात अशा स्टार्सची कमतरता नाही ज्यांनी एकामागून एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र त्यांना टीव्ही मालिकांमुळे लोकांमध्ये खरी ओळख मिळाली. इतकेच नाही तर लोक त्यांना त्या शोच्या पात्राच्या नावाने ओळखतात आणि त्यांच्या येणाऱ्या मालिकांची किंवा प्रोजेक्ट्सची आतुरतेने वाट पाहतात. 'विक्रम बेताल' (Vikram Betal Serial) मालिकेत बेतालची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे नाव देखील या यादीत समाविष्ट आहे. बेतालची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीत १५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. यापैकी काहींमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आणि इतर चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या होत्या.

नव्वदच्या दशकात दूरदर्शन पाहणाऱ्यांना त्या वेळी विक्रम बेताल किती लोकप्रिय होता हे चांगलेच माहिती असेल. मुख्य भूमिकेत रामायणात रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल मुख्य भूमिकेत होते, परंतु सर्वांचे लक्ष त्याच्या पाठीवर स्वार असलेल्या वेताळाकडे वेधले गेले होते. ही भूमिका सज्जन कुमार यांनी साकारली होती. त्याची लोकप्रियता इतकी होती की लोक त्याला वेताळ या नावाने ओळखायचे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेने मालिकेत जिवंतपणा आणला. त्यावेळी विक्रम बेताल हा टीव्ही पाहणाऱ्यांची पहिली पसंती होता. या मालिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. यामुळेच २०१८ मध्ये एका लोकप्रिय टीव्ही चॅनेलवर त्याची दुसरी आवृत्ती आली. तथापि, लोकांना मूळ आवृत्ती जास्त आवडली.

सज्जन कुमार यांनी धन्यवाद या चित्रपटापासून अभिनयाला सुरुवात केली. १९५० ते १९६० दरम्यान या अभिनेत्याने अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले. विक्रम बेताल मालिकेला पसंती असणारे लोक अजूनही सज्जन यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचा जन्म १९२१ मध्ये जयपूरमध्ये झाला होता. त्यांना व्यवसायाने वकील व्हायचे होते, परंतु नशिबाने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळेच ठेवले होते. अभिनयाच्या जगात प्रवेश केल्यानंतर त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले, परंतु वेताळच्या भूमिकेनंतर त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. काही लोकांना अजूनही माहित नाही की त्यांचे निधन झाले आहे. १७ मे २००० रोजी या लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. परंतु त्यांच्या उत्कृष्ट कामाची चर्चा अजूनही लोकांमध्ये आहे.

Web Title: Do you remember Betal from the series 'Vikram-Betal'? The actor said goodbye to the world in 2000.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.