Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:01 IST2025-06-12T17:01:32+5:302025-06-12T17:01:56+5:30
Salman Khan on Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सलमान खानने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्याला सपोर्ट केला असून कौतुकही केलं आहे

Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
Air India Plane Crash: नुकतंच अहमदाबादविमान दुर्घटनेच्या बातमीने सर्वांना धक्का बसलाय. २४२ प्रवाशांना घेऊन जात असणारं हे विमान क्रॅश झालं. हे विमान लंडनकडे उड्डाण करत असताना हा मोठा अपघात झाला. यामुळे २४२ प्रवाशांचा जीव धोक्यात आला असून यापैकी कितीजण सुखरुप आहेत आणि किती जणांचं या अपघातात निधन झालं, याविषयी माहिती समोर यायची आहे. अहमदाबाद विमान अपघाताच्या या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सलमान खानने मोठा निर्णय घेतला आहे. काय म्हणाला अभिनेता?
विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सलमानचा मोठा निर्णय
सलमान खान आज इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगमध्ये (ISRL) सहभागी होणार होता. मुंबईत हा इव्हेंट होणार होता. परंतु हा इव्हेंट आज रद्द करुन तो पुढे ढकलण्यात आला आहे. अहमदाबाद विमान अपघात दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सलमान खान आणि इव्हेंटच्या आयोजकांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. याविषयी इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचे संस्थापक ईशान लोखंडे यांच्याकडून निवेदन प्रसिद्धीसाठी देण्यात आलं आहे.
"आपल्याला सर्वांना आज घडलेल्या अत्यंत दुःखद घटनेची बातमी समजली आहे. या कठीण प्रसंगी इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग आणि श्री. सलमान खान संपूर्ण राष्ट्रासोबत एकजुटीने उभे आहेत. या दुर्घटनेत बाधित झालेल्या सर्व कुटुंबीयांप्रती आमच्या मनःपूर्वक संवेदना व प्रार्थना आहेत. हा कार्यक्रम पुढील तारखेस हलवण्याचा निर्णय जबाबदारीने आणि संयुक्तरीत्या घेतला आहे.", असं निवेदन त्यांनी दिलं आहे. अशाप्रकारे अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सलमानने घेतलेल्या निर्णयाला अनेकांनी समर्थन दिलं आहे.
Air India Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे बॉलीवूड कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
अहमदाबाद विमानतळावर दुपारी बोईंग एआय - १७१ या विमानाने लंडनसाठी उड्डाण करताच दोन मिनिटांनीच विमानाचे इंजिन फेल झाले. पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, परंतू विमान एवढ्या कमी उंचीवर होते की पायलटही काही करू शकले नाहीत आणि विमान झाडांवर आदळले व मोठा अपघात झाला.
विमान कोसळताच भलेमोठे आगीचे आणि धुराचे लोळ उठले, एवढे की धुरीचे हे लोळ अहमदाबादमध्ये दोन किमी वरून दिसत होते. ज्या इमारतींवर हे विमान कोसळले त्या इमारती जळून खाक झाल्या आहेत. इमारतींच्या परिसरातील वाहने जळून खाक झाली आहेत. रहिवासी भागात हे विमान कोसळल्याने मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता आहे.