शरद पवारांमुळे बदलला 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचा शेवट? अमोल कोल्हे म्हणाले- "त्यांनी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 11:38 IST2025-02-25T11:34:05+5:302025-02-25T11:38:46+5:30

मालिकेवर राजकीय दबाव होता का? याबाबत अमोल कोल्हेंनी उत्तर दिलं.

छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेली स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेत अमोल कोल्हेंनी शंभूराजेंची भूमिका साकारली होती.

मालिका संपून ५ वर्ष झाली तरीदेखील ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. पण, छावा सिनेमानंतर या मालिकेबाबत काही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

मालिकेवर राजकीय दबाव होता का? याबाबत अमोल कोल्हेंनी उत्तर दिलं.

"२०१७ पासून मी राजकीयदृष्ट्या अलूप होतो. मी शिवसेनेतही सक्रिय नव्हतो. मालिका २०२० ला संपली. मी २०१९ ला निवडणूक लढवली".

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी मालिकेचा शेवट अशा पद्धतीने दाखविण्यात सांगितलं होतं, असंही बोललं जात होतं.

यावर अमोल कोल्हे म्हणाले, "शरद पवारांनी कधीही एका शब्दानेही अमूक प्रसंग दाखवा किंवा दाखवू नका असं सांगितलेलं नव्हतं".

"किंबहुना पवार साहेबांनी तेव्हा मालिका पाहिलीच नव्हती. त्यांनी करोनाच्या काळात पहिल्यांदा मालिका पाहिली".

"करोना काळात मालिकेचं पुन:प्रक्षेपण करण्यात आलं होतं. त्यावेळी शरद पवारांनी पहिल्यांदा 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका संपूर्ण पाहिली".

"त्यामुळे यामध्ये शरद पवारांचा हात होता आणि कोणाला तरी खूश करण्यासाठी असा शेवट दाखवला हे धादांत खोटं आहे".