"मॅच्युअर असते तर लग्न टिकलं असतं", घटस्फोटानंतर रेशम टिपनीसला झालेला पश्चाताप, १२ वर्षांनी मोठा होता पती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:45 IST2025-06-25T15:23:20+5:302025-06-25T15:45:58+5:30
रेशम आणि संजीव सेठ यांना दोन मुलं होतं. पण, घटस्फोटानंतर रेशम टिपनीसला पश्चाताप झाला होता. एका मुलाखतीत तिने हे बोलून दाखवलं होतं.

रेशम टिपनीस ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. रेशम तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते.
तिचं लग्न 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम संजीव सेठशी झालं होतं. मात्र लग्नानंतर काही वर्षांतच घटस्फोट झाला आणि त्यांचा संसार मोडला.
रेशम आणि संजीव सेठ यांना दोन मुलं होतं. पण, घटस्फोटानंतर रेशम टिपनीसला पश्चाताप झाला होता. एका मुलाखतीत तिने हे बोलून दाखवलं होतं.
"लग्न झालं तेव्हा मी २० वर्षांची होते. लगेच गरोदर राहिले, आई झाले. घराची, मुलांची जबाबदारी सांभाळण्यासाठी मी इतकी सक्षम नव्हते. माझ्यात तितकी समजही नव्हती".
"माझ्या आणि संजीवच्या वयात १२ वर्षांचं अंतर होतं. जर आम्ही दोघे तितके मॅच्युअर असतो तर आमचा घटस्फोट झालाच नसता", असं रेशम म्हणाली होती.
१९९३ मध्ये रेशम टिपनीस आणि संजीव सेठ यांनी लग्नगाठ बांधली होती. पण, २००४ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले.
संजीव सेठ यांनी त्यानंतर अभिनेत्री लता सबरवाल हिच्याशी लग्न केलं होतं. पण, १४ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी देखील घटस्फोट घेतला आहे.
तर रेशम टिपनीस बॉयफ्रेंड संदेश कीर्तिकरसोबत सध्या लिव्ह इनमध्ये राहत आहे.