"...म्हणून मी संपूर्ण शूटिंगमध्ये अक्षय खन्नाशी बोललोच नाही", संतोष जुवेकर हे काय बोलून गेला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 16:48 IST2025-03-02T16:32:35+5:302025-03-02T16:48:24+5:30

संतोषने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत संपूर्ण शूटिंगमध्ये अक्षय खन्नासोबत बोललोही नसल्याचा खुलासा केला.

विकी कौशलच्या छावा सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या सिनेमात रायाजीची भूमिका साकारून संतोष जुवेकरने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.

नुकतीच संतोषने न्यूज १८ लोकमतला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने संपूर्ण शूटिंगमध्ये अक्षय खन्नासोबत बोललोही नसल्याचा खुलासा केला.

याचं कारण सांगत अभिनेता म्हणाला, "सिनेमात ज्यांनी मुघलांच्या भूमिका साकारल्या त्या कोणाशीच मी बोललो नाही. संपूर्ण शूटिंगमध्ये मी तरी त्या कोणत्याही पात्राशी बोललो नाही".

"औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या काही सीन्सचं शूटिंग सुरू असताना मी लक्ष्मण सरांना भेटायला गेलो होतो".

"मी सरांना भेटलो आणि निघालो. बाजूला अक्षय खन्ना बसला होता. पण, मी त्याच्याकडे बघितलंही नाही".

"मी बघूच शकत नाही. माझा अक्षय खन्नावर राग नाही. त्याने उत्तम काम केलं आहे. पण, माहीत नाही का त्यांच्याशी बोलावंसं वाटलं नाही".

"मी त्यांचा द्वेष करत नाही. पण, मी सेटवर एक शब्दही त्यांच्याशी बोललो नाही".