सिद्धार्थ-कियाराच नाही, तर बॉलिवूडचे हे कलाकार शूटिंग करता करता पडले एकमेकांच्या प्रेमात, केलं लग्न, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 06:00 AM2023-02-09T06:00:00+5:302023-02-09T06:00:00+5:30

Bollywood Couple: बॉलिवूडमध्ये असे काही लोकप्रिय कपल्स आहेत, जे चित्रपटात काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग लग्नगाठ बांधली.

बॉलिवूडचे नवविवाहित जोडपे कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी ७ फेब्रुवारी रोजी जैसलमेरच्या 'सूर्यगढ पॅलेस'मध्ये कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत शाही पद्धतीने विवाह केला. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या जोडप्याची प्रेमकहाणी शेरशाह चित्रपटाच्या सेटपासून सुरू झाली होती.

रणबीर कपूर आणि आलिया भटची लव्हस्टोरीदेखील चित्रपटाच्या सेटपासून सुरू झाली. २०१७ मध्ये 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्रवास करत असताना दोघांमध्ये संवाद सुरू झाला आणि त्यानंतर दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रूपांतर झाले. या जोडप्याने पाच वर्षे डेटिंग केल्यानंतर १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न केले.

या यादीत रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचाही समावेश आहे. राम लीला चित्रपटाच्या सेटपासूनही त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. जवळपास ६ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २०१८ साली इटलीमध्ये लग्न केले.

बॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून ओळखले जाणारे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनीही लग्नाआधी काही वर्षे एकमेकांना डेट केले होते. गुरू या चित्रपटाच्या सेटवर दोघांची जवळीक वाढली आणि त्यानंतर २००७ मध्ये त्यांनी लग्न केले.

बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूरने सैफ अली खानसोबत २०१२ साली कोर्ट मॅरेज केले होते. टशन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या जवळ आले होते. करिनाच्या प्रेमात सैफने आपल्या हातावर करिनाच्या नावाचा टॅटूही बनवला होता.

रितेश आणि जिनिलियाने तुझे मेरी कसम या चित्रपटात एकत्र काम केले आणि तिथूनच त्यांच्या प्रेम कहाणीची सुरुवात झाली होती. तुझे मेरी कसमनंतर या दोघांनी मस्ती या चित्रपटात पुन्हा एकत्र काम केले. त्यानंतर त्यांचे नाते अधिक फुललं. तब्बल १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली.

बॉलिवूडचे पॉवर कपल अजय देवगण आणि काजोल या दोघांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. 'हलचल' या चित्रपटात दोघे पहिल्यांदाच दिसले होते आणि खऱ्या प्रेमकथेची सुरुवातही याच चित्रपटातून झाली होती.

अमिताभ बच्चन आणि जया यांच्या प्रेमकथेची सुरुवातही 'गुड्डी' चित्रपटापासून झाली होती. दोघांनी ३ जून १९७३ रोजी लग्न केले. यावर्षी हे जोडपे त्यांच्या लग्नाचा ५०वा वाढदिवस साजरा करणार आहेत.