Janhvi Kapoor : "मला नवरा आणि ३ मुलांसह तिरुपतीला स्थायिक व्हायचंय"; जान्हवी कपूरने लग्नाबद्दल सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:56 IST2025-01-24T12:35:01+5:302025-01-24T12:56:50+5:30
Janhvi Kapoor : जान्हवी कपूरने आपल्या लग्नाबद्दल मौन सोडलं आहे आणि वेडिंग प्लॅनिंगनंतरचे सर्व प्लॅन्स सांगितले आहेत.

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत आहे. शिखर पहाडियासोबतचं अभिनेत्रीचं नातं आता सर्वांनाच माहीत झालं आहे.
जान्हवी कपूरने आपल्या लग्नाबद्दल मौन सोडलं आहे आणि वेडिंग प्लॅनिंगनंतरचे सर्व प्लॅन्स सांगितले आहेत.
अभिनेत्रीचं तिरुपतीशी खूप जूनं आणि खास नातं आहे. ती दरवर्षी आपल्या वाढदिवसाला मंदिरात जाते.
कोमल नाहटाच्या शोमध्ये जान्हवीने सांगितलं की, एक दिवस मी आपला पती आणि तीन मुलांसह तिरुपतीला स्थायिक होऊ इच्छिते.
अभिनेत्री म्हणाली, "नवरा आणि तीन मुलांसह तिरुमाला तिरुपतीला स्थायिक होण्याचा विचार करत आहे."
"ती एक साधारण जीवन जगेल. केळ्याच्या पानावर जेवेल आणि गोविंदा गोविंदा असा जप करेल."
केसात मोगऱ्याचा गजरा घालावा, मणिरत्नम यांचं संगीत ऐकावं आणि नवऱ्याने लुंगी घालावी अशी जान्हवीची इच्छा आहे.
अभिनेत्रीने सांगितलं, तिचं लग्न हे तिरुपतीमध्ये होईल. मेहंदी आणि संगीत हे तिची आई श्रीदेवीच्या चेन्नईतील घरात होईल.
मोगरा आणि मेणबत्तीची पारंपारीक सजावट असेल अशा पद्धतीने ती लग्न करणार आहे. जान्हवीचे असंख्य चाहते आहेत.
अभिनेत्री सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.