सलमान खानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या रायला बसला खूप फटका, गमावल्या या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 04:32 PM2021-03-15T16:32:33+5:302021-03-15T16:35:36+5:30

ऐश्वर्या राय सलमान खानपासून वेगळी झाली खरी. पण तिला या गोष्टींचा सामना करावा लागला.

''कितने अजीब रिश्ते हैं यहाँ…. ''या गाण्याच्या ओळी बॉलीवुडसाठी अगदी चपखल बसतात. कारण इथे कधी नवी नाती बनतात आणि कधी बनलेली नाती अगदी सहज तुटतात याचा काही नेम नाही

कधी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे दुरावतात तर कधी एकमेकांची तोंडंही न पाहणारे बंधनात अडकतात. असंच काहीसं घडलं ते बॉलीवुडचा मोस्ट एलिजेबल बॅचलर म्हणजे दबंग सलमान खान आणि ऐश्वर्याबाबत.

सलमानचा स्वभाव या नात्यामध्ये दुरावा आणण्यास कारणीभूत ठरला. ऐश्वर्या सलमानपासून वेगळी झाली खरी. पण, तिला बऱ्याच गोष्टींचा नाहक त्रास झाला.

सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याचा उल्लेख होतो तेव्हा 'चलते चलते' या चित्रपटाचंही नाव पुढे येते. या चित्रपटाच्या सेटवर सलमानने गोंधळ केला होता. शाहरुख खानशीही त्याचे यादरम्यान मतभेद झाले होते.

परिणामी ऐश्वर्याचा चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवत या भूमिकेसाठी राणी मुखर्जीची निवड करण्यात आली.

सलमान खानशी झालेल्या ब्रेअकपनंतर ऐश्वर्या राय अनेक मोठ्या चित्रपटांना मुकली होती.

एकेकाळी यशशिखरावर असणाऱ्या ऐश्वर्याला या नात्यामुळे पुढे आपल्याहून नवोदीत कलाकारांसोबतही स्क्रीन शेअर करावी लागली होती.