काय म्हणतीये या चित्रपटाची टिम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 13:02 IST2016-12-25T13:02:21+5:302016-12-25T13:02:21+5:30
'ती सध्या काय करते' या चित्रपटाची नुकतीच पत्रकार परिषद पुण्यात पार पडली यावेळी दिग्दर्शक सतीश राजवाडे निर्माते झी स्टुडिओजचे ...

काय म्हणतीये या चित्रपटाची टिम
' ;ती सध्या काय करते' या चित्रपटाची नुकतीच पत्रकार परिषद पुण्यात पार पडली यावेळी दिग्दर्शक सतीश राजवाडे निर्माते झी स्टुडिओजचे बिझनेस हेड निखिल साने, निर्माते अरविंद जोग, अभिनेते अंकुश चौधरी, अभिनय बेर्डे, अभिनेत्री तेजश्री प्रधान, आर्या आंबेकर, इशा फडके आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले की, प्रत्येक जण किमान एकदा तरी प्रेमात पडतोच, आणि एकमेकांच्या प्रेमात पाडण्यासाठी दोघांची गरज असते असं माझं ठाम मत आहे. कधीतरी मित्रांसोबत बसलेलो असताना हा प्रश्न खरंच डोकावतो की ती सध्या काय करत असेल ? आणि ह्याच भावनेला घेऊन हा चित्रपट बनवला आहे. त्यामुळे ती सध्या काय करते हाअनुराग इतकाच तन्वीचा चित्रपट आहे. अनुरागच्या भूमिकेत अंकुश आणि अभिनय, तन्वीच्या भूमिकेत तेजश्री आणि आर्या असणं हे खरंच माझ्यासाठी आणि चित्रपटासाठी खूप महत्वाचं आहे. या चित्रपटाची कथा आहे प्रत्येकाच्या पहिल्या प्रेमाची. ही कथा आहे अनुराग आणि तन्वीची. त्यांच्या शाळेच्या अल्लड दिवसांपासून ते आजपर्यंतची. प्रेमाला वयाचं बंधन नसतं. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कोणीतरी एक खास माणूस असतं. आपल्या मनात एक हक्काची जागा असलेलं. अनुराग आणि तन्वी ह्याला अपवाद नाहीत. ती सध्या..जितकी ह्या दोघांची गोष्ट आहे तितकीच प्रेमात पडलेल्या प्रत्येकाची ! पण प्रेमकथेची खरी गंमत त्याच्या हळुवार उलगडण्यात असते आणि ह्या चित्रपटातून ती अनोख्या पद्धतीने मांडण्याचा सतीश राजवाडें यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या चित्रपटात अनुराग आणि तन्वीच्या प्रेमकथेचे तीन टप्पे अनुभवायला मिळणार असून अनुरागची भूमिका साकारली आहे हृदित्य राजवाडे,अभिनय बेर्डे आणि अंकुश चौधरीने तर तन्वीच्या भूमिकेत निर्मोही अग्निहोत्री, गायिका-अभिनेत्री आर्या आंबेकर आणि तेजश्री प्रधान आहे. याशिवाय चित्रपटात सुकन्या कुलकर्णी- मोने, संजय मोने, अनुराधा राजाध्यक्ष, प्रसाद बर्वे आणि तुषार दळवी हे कलाकारही महत्वाच्या भूमिकेत आहेत. झी स्टुडिओज् चे निखिल साने आणि असंख्य प्रोडक्शनच्या पल्लवी राजवाडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन सतीश राजवाडे यांचे असून, पटकथा आणि संवाद मनस्विनी लता रवींद्र यांचे आहेत. चित्रपटाचं संकलन केलंय राहुल भाटणकर यांनी छायाआरेखन आहे सुहास गुजराथी यांचं. या चित्रपटात एकूण चार गाणी असून ती संगीतबद्ध केली आहेत निलेश मोहरीर, अविनाश - विश्वजित आणि मंदार आपटे यांनी. यात जरा जरा आणि परिकथेच्या पऱ्या ही गाणी अश्विनी शेंडे यांनी शब्दबद्ध केली असून ती आर्या आंबेकर आणि हृषीकेश रानडे यांनी गायली आहेत. हृदयात वाजे समथिंग हे गाणं लिहिलंय विश्वजित जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांनी तर स्वरबद्ध केलंय हृदित पाटणकर, रोहित राऊत आणि आर्या आंबेकर यांनी. सोशल मिडीयावर या चित्रपटाच्या टिझरला काही दिवसांतच पाच लाखाहुन जास्त व्हयूवज् मिळाले असून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढणार यात शंका नाही. हा सिनेमा नवीन वर्षात म्हणजेच ६ जानेवारी २०१७ ला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
याप्रसंगी बोलताना दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले की, प्रत्येक जण किमान एकदा तरी प्रेमात पडतोच, आणि एकमेकांच्या प्रेमात पाडण्यासाठी दोघांची गरज असते असं माझं ठाम मत आहे. कधीतरी मित्रांसोबत बसलेलो असताना हा प्रश्न खरंच डोकावतो की ती सध्या काय करत असेल ? आणि ह्याच भावनेला घेऊन हा चित्रपट बनवला आहे. त्यामुळे ती सध्या काय करते हाअनुराग इतकाच तन्वीचा चित्रपट आहे. अनुरागच्या भूमिकेत अंकुश आणि अभिनय, तन्वीच्या भूमिकेत तेजश्री आणि आर्या असणं हे खरंच माझ्यासाठी आणि चित्रपटासाठी खूप महत्वाचं आहे. या चित्रपटाची कथा आहे प्रत्येकाच्या पहिल्या प्रेमाची. ही कथा आहे अनुराग आणि तन्वीची. त्यांच्या शाळेच्या अल्लड दिवसांपासून ते आजपर्यंतची. प्रेमाला वयाचं बंधन नसतं. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कोणीतरी एक खास माणूस असतं. आपल्या मनात एक हक्काची जागा असलेलं. अनुराग आणि तन्वी ह्याला अपवाद नाहीत. ती सध्या..जितकी ह्या दोघांची गोष्ट आहे तितकीच प्रेमात पडलेल्या प्रत्येकाची ! पण प्रेमकथेची खरी गंमत त्याच्या हळुवार उलगडण्यात असते आणि ह्या चित्रपटातून ती अनोख्या पद्धतीने मांडण्याचा सतीश राजवाडें यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या चित्रपटात अनुराग आणि तन्वीच्या प्रेमकथेचे तीन टप्पे अनुभवायला मिळणार असून अनुरागची भूमिका साकारली आहे हृदित्य राजवाडे,अभिनय बेर्डे आणि अंकुश चौधरीने तर तन्वीच्या भूमिकेत निर्मोही अग्निहोत्री, गायिका-अभिनेत्री आर्या आंबेकर आणि तेजश्री प्रधान आहे. याशिवाय चित्रपटात सुकन्या कुलकर्णी- मोने, संजय मोने, अनुराधा राजाध्यक्ष, प्रसाद बर्वे आणि तुषार दळवी हे कलाकारही महत्वाच्या भूमिकेत आहेत. झी स्टुडिओज् चे निखिल साने आणि असंख्य प्रोडक्शनच्या पल्लवी राजवाडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन सतीश राजवाडे यांचे असून, पटकथा आणि संवाद मनस्विनी लता रवींद्र यांचे आहेत. चित्रपटाचं संकलन केलंय राहुल भाटणकर यांनी छायाआरेखन आहे सुहास गुजराथी यांचं. या चित्रपटात एकूण चार गाणी असून ती संगीतबद्ध केली आहेत निलेश मोहरीर, अविनाश - विश्वजित आणि मंदार आपटे यांनी. यात जरा जरा आणि परिकथेच्या पऱ्या ही गाणी अश्विनी शेंडे यांनी शब्दबद्ध केली असून ती आर्या आंबेकर आणि हृषीकेश रानडे यांनी गायली आहेत. हृदयात वाजे समथिंग हे गाणं लिहिलंय विश्वजित जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांनी तर स्वरबद्ध केलंय हृदित पाटणकर, रोहित राऊत आणि आर्या आंबेकर यांनी. सोशल मिडीयावर या चित्रपटाच्या टिझरला काही दिवसांतच पाच लाखाहुन जास्त व्हयूवज् मिळाले असून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढणार यात शंका नाही. हा सिनेमा नवीन वर्षात म्हणजेच ६ जानेवारी २०१७ ला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.