चूकभूल द्यावी घ्यावी या नाटकानंतर नयना आपटे टिळक आणि आगरकर या नाटकात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 09:43 IST2017-07-29T04:13:01+5:302017-07-29T09:43:01+5:30
विश्राम बेडेकर लिखित “टिळक आणि आगरकर” हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर येत आहे. 'अभिजात नाट्यसंस्था' आणि 'श्री आर्यादुर्गा क्रिएशन' ...
चूकभूल द्यावी घ्यावी या नाटकानंतर नयना आपटे टिळक आणि आगरकर या नाटकात
व श्राम बेडेकर लिखित “टिळक आणि आगरकर” हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर येत आहे. 'अभिजात नाट्यसंस्था' आणि 'श्री आर्यादुर्गा क्रिएशन' या दोन अग्रगण्य नाट्यसंस्था हे नाटक पुनरुज्जीवित करीत आहेत. लोकमान्य टिळक हे महाराष्ट्रीय राजकारणातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व. गोपाळ गणेश आगरकर हे त्या मानाने महाराष्ट्राला अल्प परिचित आणि विस्मृतीत गेलेले. खरं तर टिळक आणि आगरकर हे महाराष्ट्राचे सूर्य आणि चंद्रच म्हणायला हवेत. समाज सुधारला पाहिजे ही दोघांचीही तळमळ; परंतु सुधारणा राजकीय की सामाजिक यावर दोघांचेही मतभेद! सुरुवातीला जीवाला जीव देणारे टिळक आणि आगरकर त्यांच्यातल्या मतभेदांमुळे आणि लोकहिताच्या विचारांनी एकमेकांपासून कसे दूर गेले, विलग होऊनही दोघांनी आपापल्या परीने देशकल्याणार्थ काय काय केले आणि आगरकरांना आजारपणात टिळकांची लागलेली ओढ असा जवळजवळ १५ वर्षांचा कालावधी लेखक विश्राम बेडेकरांनी अतिशय मार्मिकपणे पण तितक्याच हळूवारपणे या नाटकात मांडला आहे.
टिळक आणि आगरकरांच्या वेळी असलेले तत्कालीन सामाजिक प्रश्न आजही पूर्णपणे सुटलेले नाहीत. त्यामुळे हे नाटक ऐतिहासिक असले तरी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे आहे. टिळक आणि आगरकरांच्या मैत्रीचे एक अनमोल दर्शन घडवणारे हे नाटक प्रेक्षकांना एका क्षणी सुन्न करणारे आहे. दोन दशकांपूर्वी मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगांव या संस्थेने हे नाटक प्रथम रंगभूमीवर आणले होते. त्यात प्रमोद पवार, श्याम पोंक्षे, भक्ती बर्वे, निवेदिता सराफ, जयंत सावरकर यांनी भूमिका साकारल्या होत्या. या नाटकावर अजूनपर्यंत साहित्य संघाचाच शिक्का होता. मात्र हा शिक्का पुसून आता 'अभिजात नाट्यसंस्था' आणि 'श्री आर्यादुर्गा क्रिएशन' नव्या प्रकारे नाटक पुनर्निर्मित करत आहेत. टिळक आणि आगरकरांचे राष्ट्रीय विचार पोहोचवणे हा उद्देश त्यामागे आहे. या नाटकात नयना आपटे, सुनिल रमेश जोशी, आकाश भडसावळे, संध्या म्हात्रे यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांनी त्यांच्या एका विशिष्ट विनोदी ढंगाने सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच येत्या ३१ जुलै, २०१७ या दिवशी दुपारी ४ वाजता शिवाजी नाट्यमंदिर, दादर येथे “टिळक आणि आगरकर” या नाटकाचा शुभारंभ होत आहे.
नयना आपटे सध्या चूकभूल द्यावी घ्यावी या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. त्यांची नानी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहे.
Also Read : 'चुकभूल द्यावी घ्यावी' मालिका घेणार रसिकांचा निरोप
टिळक आणि आगरकरांच्या वेळी असलेले तत्कालीन सामाजिक प्रश्न आजही पूर्णपणे सुटलेले नाहीत. त्यामुळे हे नाटक ऐतिहासिक असले तरी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे आहे. टिळक आणि आगरकरांच्या मैत्रीचे एक अनमोल दर्शन घडवणारे हे नाटक प्रेक्षकांना एका क्षणी सुन्न करणारे आहे. दोन दशकांपूर्वी मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगांव या संस्थेने हे नाटक प्रथम रंगभूमीवर आणले होते. त्यात प्रमोद पवार, श्याम पोंक्षे, भक्ती बर्वे, निवेदिता सराफ, जयंत सावरकर यांनी भूमिका साकारल्या होत्या. या नाटकावर अजूनपर्यंत साहित्य संघाचाच शिक्का होता. मात्र हा शिक्का पुसून आता 'अभिजात नाट्यसंस्था' आणि 'श्री आर्यादुर्गा क्रिएशन' नव्या प्रकारे नाटक पुनर्निर्मित करत आहेत. टिळक आणि आगरकरांचे राष्ट्रीय विचार पोहोचवणे हा उद्देश त्यामागे आहे. या नाटकात नयना आपटे, सुनिल रमेश जोशी, आकाश भडसावळे, संध्या म्हात्रे यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांनी त्यांच्या एका विशिष्ट विनोदी ढंगाने सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच येत्या ३१ जुलै, २०१७ या दिवशी दुपारी ४ वाजता शिवाजी नाट्यमंदिर, दादर येथे “टिळक आणि आगरकर” या नाटकाचा शुभारंभ होत आहे.
नयना आपटे सध्या चूकभूल द्यावी घ्यावी या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. त्यांची नानी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहे.
Also Read : 'चुकभूल द्यावी घ्यावी' मालिका घेणार रसिकांचा निरोप