बदलत जाणाºया पुण्यातील जगण्याची गोष्ट 'एक ते चार बंद' चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2017 17:33 IST2017-01-15T17:33:58+5:302017-01-15T17:33:58+5:30
पुणे या शहरावर अनेक विनोद केले जातात. हे विनोद सोशलमीडियावरदेखील हीट झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात पुण्यातील एक ...
.jpg)
बदलत जाणाºया पुण्यातील जगण्याची गोष्ट 'एक ते चार बंद' चित्रपटात
प णे या शहरावर अनेक विनोद केले जातात. हे विनोद सोशलमीडियावरदेखील हीट झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात पुण्यातील एक ते चार बंद हे वाक्य तर सुपरहीटच आहे. मात्र पुण्याचा हा दृष्टीकोन पकडता पुण्यातील जगण्याची गोष्ट आता प्रेक्षकांसमोर रूपेरी पडदयावर दिसणार आहे.
'एक ते चार बंद' या चित्रपटात झपाट्याने बदलत जाणाºया पुण्यातील जगण्याची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आधुनिक काळानुसार शहरे जशी बदलत जातात तसे तेथील जीवनमानही बदलत जाते मात्र जीवनमूल्ये लवकर बदलत नाहीत. त्यामुळे कात्रीत सापडलेल्या पात्रांची या चित्रपटात 'कहाणी' सांगण्यात आली आहे असे या चित्रपटाचे दिग्दर्शक अपूर्व साठे यांनी शनिवारी पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितले.
ते म्हणाले, पुण्यासारखी शहरे झपाट्याने बदलत जात असली त्यामानाने मानसिकता बदललेली नाही त्यामुळेच जीवनमूल्ये प्रश्नार्थक बनली आहेत. त्याची गोष्ट वैयक्तिक अनुभवातून आणि लग्नासारख्या विषयाच्या कथेतून या चित्रपटातून सादर करण्यात आली आहे. तर लेखक निखिल खैरे यांनी बदलत्या पुण्याची कथा सांगायची असल्यामुळे पुणे शहराच्या ओळखीचे वैशिष्ट्य सांगण्यासाठी चित्रपटाचे शीर्षक 'एक ते चार बंद' असे ठेवले असे एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. छायालेखक दीपक मेनन आणि प्रमुख भूमिका आकारणारे पद्मनाभ बिंड यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
पंधराव्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पर्धात्मक मराठी चित्रपटांमध्ये 'एक ते चार बंद' हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. त्यानिमित्त श्री समर नखाते यांनी 'एक ते चार बंद' च्या टीमशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी चित्रपटाचे लेखक निखिल खैरे, छायालेखक दीपक मेनन आणि चित्रपटातील प्रमुख कलाकार पद्मनाभ बिंड हे उपस्थित होते.
'एक ते चार बंद' या चित्रपटात झपाट्याने बदलत जाणाºया पुण्यातील जगण्याची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आधुनिक काळानुसार शहरे जशी बदलत जातात तसे तेथील जीवनमानही बदलत जाते मात्र जीवनमूल्ये लवकर बदलत नाहीत. त्यामुळे कात्रीत सापडलेल्या पात्रांची या चित्रपटात 'कहाणी' सांगण्यात आली आहे असे या चित्रपटाचे दिग्दर्शक अपूर्व साठे यांनी शनिवारी पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितले.
ते म्हणाले, पुण्यासारखी शहरे झपाट्याने बदलत जात असली त्यामानाने मानसिकता बदललेली नाही त्यामुळेच जीवनमूल्ये प्रश्नार्थक बनली आहेत. त्याची गोष्ट वैयक्तिक अनुभवातून आणि लग्नासारख्या विषयाच्या कथेतून या चित्रपटातून सादर करण्यात आली आहे. तर लेखक निखिल खैरे यांनी बदलत्या पुण्याची कथा सांगायची असल्यामुळे पुणे शहराच्या ओळखीचे वैशिष्ट्य सांगण्यासाठी चित्रपटाचे शीर्षक 'एक ते चार बंद' असे ठेवले असे एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. छायालेखक दीपक मेनन आणि प्रमुख भूमिका आकारणारे पद्मनाभ बिंड यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
पंधराव्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पर्धात्मक मराठी चित्रपटांमध्ये 'एक ते चार बंद' हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. त्यानिमित्त श्री समर नखाते यांनी 'एक ते चार बंद' च्या टीमशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी चित्रपटाचे लेखक निखिल खैरे, छायालेखक दीपक मेनन आणि चित्रपटातील प्रमुख कलाकार पद्मनाभ बिंड हे उपस्थित होते.