रणांगण ११ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 09:41 IST2018-05-10T04:11:46+5:302018-05-10T09:41:46+5:30
सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला सचिन पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी या जोड गोळीचा 'रणांगण' हा चित्रपट नुकताच ११ मे ...
रणांगण ११ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित
स ्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला सचिन पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी या जोड गोळीचा 'रणांगण' हा चित्रपट नुकताच ११ मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळत असलेला दिसून येतो आहे. तब्बल दहा वर्षांनी पुन्हा एकदा सचिन पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी एकत्र रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणारं असून प्रथमच ते एकमेकांच्या विरोधी भूमिका पार पडताना दिसून येत आहेत.
या चित्रपटातील रणांगण हे नात्यांमधील द्वंद्वाचं असलयामुळे ते सर्वार्थाने वेगळं ठरतं असल्याचे चित्रपट पाहून बाहेर येणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून समजते. नात्यांना लागलेला सुरूंग फोडून नात्यांची खरी बाजू मांडणारा श्लोक, आपल्या कुटूंबाची मानमरातब जपत असताना डावपेच रचणारे श्यामराव देशमुख आणि या एकंदर खेळात वेठीला धरलेलं त्यांचं कुटूंब... अशाप्रकारे कलियुगात बदलत चाललेल्या नात्यांचं हृदयस्पर्शी चित्रण दिग्दर्शक राकेश सारंग दिग्दर्शित रणांगण या चित्रपटाची हवा सध्या सर्वत्र पसरलेली आहे.
निर्माते करिष्मा जैन, जो राजन, सहनिर्माते अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी, कार्तिक निशानदर निर्मित रणांगण या चित्रपटाची कथा दिग्दर्शक राकेश सारंग यांनी लिहिली असून चित्रपटाच्या कथेला पूरक संगीत या चित्रपटाला लाभलेल्या अवधूत गुप्ते, राहुल रानडे आणि शशांक पोवार या संगीतकारांनी दिला आहे. तर सचिन पिळगांवकरांनीही एक गाणं संगीतबध्द करून आपली आणखी एक छटा प्रेक्षकांना दाखवून दिली आहे. या चित्रपटाला साजेशी गाणी गुरू ठाकूर आणि समीर सामंत यांनी लिहिली असून या चित्रपटाच्या गीतांना आनंदी जोशी, वैशाली माडे, स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते यांचे स्वर लाभले आहेत.
रणांगणातील या युध्दामागची नक्की कारणं काय? नवं पिढीतील अशा कोणत्या गूढ सत्याचा या चित्रपटात उलगडा होणार आहे? कोणत्या परिस्थितीने या दोघांना रणांगणात एकमेकांविरोधात उभं केलं आहे? या रणांगणात विजयी कोण ठरणार… या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आजच्या युगात आजची कलाकृती मांडणारा 52 विक्स एंटरटेनमेंट आणि हार्वे फिल्म्स प्रस्तुत आणि ग्लोबल एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) निर्मित रणांगण चित्रपट तुम्ही लवकरच ११ मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा कारण, आता युद्ध अटळ आहे!
या चित्रपटातील रणांगण हे नात्यांमधील द्वंद्वाचं असलयामुळे ते सर्वार्थाने वेगळं ठरतं असल्याचे चित्रपट पाहून बाहेर येणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून समजते. नात्यांना लागलेला सुरूंग फोडून नात्यांची खरी बाजू मांडणारा श्लोक, आपल्या कुटूंबाची मानमरातब जपत असताना डावपेच रचणारे श्यामराव देशमुख आणि या एकंदर खेळात वेठीला धरलेलं त्यांचं कुटूंब... अशाप्रकारे कलियुगात बदलत चाललेल्या नात्यांचं हृदयस्पर्शी चित्रण दिग्दर्शक राकेश सारंग दिग्दर्शित रणांगण या चित्रपटाची हवा सध्या सर्वत्र पसरलेली आहे.
निर्माते करिष्मा जैन, जो राजन, सहनिर्माते अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी, कार्तिक निशानदर निर्मित रणांगण या चित्रपटाची कथा दिग्दर्शक राकेश सारंग यांनी लिहिली असून चित्रपटाच्या कथेला पूरक संगीत या चित्रपटाला लाभलेल्या अवधूत गुप्ते, राहुल रानडे आणि शशांक पोवार या संगीतकारांनी दिला आहे. तर सचिन पिळगांवकरांनीही एक गाणं संगीतबध्द करून आपली आणखी एक छटा प्रेक्षकांना दाखवून दिली आहे. या चित्रपटाला साजेशी गाणी गुरू ठाकूर आणि समीर सामंत यांनी लिहिली असून या चित्रपटाच्या गीतांना आनंदी जोशी, वैशाली माडे, स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते यांचे स्वर लाभले आहेत.
रणांगणातील या युध्दामागची नक्की कारणं काय? नवं पिढीतील अशा कोणत्या गूढ सत्याचा या चित्रपटात उलगडा होणार आहे? कोणत्या परिस्थितीने या दोघांना रणांगणात एकमेकांविरोधात उभं केलं आहे? या रणांगणात विजयी कोण ठरणार… या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आजच्या युगात आजची कलाकृती मांडणारा 52 विक्स एंटरटेनमेंट आणि हार्वे फिल्म्स प्रस्तुत आणि ग्लोबल एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) निर्मित रणांगण चित्रपट तुम्ही लवकरच ११ मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा कारण, आता युद्ध अटळ आहे!