"त्यांनाच जबाबदार धरलं पाहिजे" अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अभिनेता संतापला, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:33 IST2025-06-13T16:32:38+5:302025-06-13T16:33:05+5:30

मराठी अभिनेत्यानं अहमदाबाद विमान दुर्घटनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

Ahmedabad Air India Plane Crash Pushkar Jog Gets Angry Shares Says Boeing And Air India Have To Answer | "त्यांनाच जबाबदार धरलं पाहिजे" अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अभिनेता संतापला, म्हणाला...

"त्यांनाच जबाबदार धरलं पाहिजे" अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अभिनेता संतापला, म्हणाला...

Plane Crash: अहमदाबादमध्येविमान दुर्घटना घडली आहे. एअर इंडियाच्या बोईंग विमानाचा भीषण  (Ahmedabad Plane Crash) अपघात झाला. हे विमान २४२ प्रवाशांसह लंडनमध्ये उड्डाण करायला सज्ज होतं. परंतु टेकऑफनंतर काहीच मिनिटांमध्येच नजीकच्या हॉस्टेलमध्ये हे विमान आदळलं आणि मोठा स्फोट झाला. त्यामुळे विमानातील प्रवासी आणि हॉस्टेलमध्ये तेव्हा उपस्थित असलेले लोक यांचाही मृत्यू झाला.  या अपघातात आतापर्यंत जवळपास २९५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या विमान अपघातानंतर बचाव कार्यही पूर्ण झाले आहे. या दुःखद अपघातावर शोक व्यक्त केला जातोय. तर अनेकांनी सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संताप व्यक्त केलाय. मराठी अभिनेता पुष्कर जोग याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत विमान दुर्घटनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

पुष्कर जोगने अत्यंत संतप्त आणि भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून केवळ दु:खच नव्हे तर विमान वाहतूक व्यवस्थेतील ढिसाळपणावर थेट सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. त्यानं लिहिलं, "मी सुन्न आहे, नि:शब्द झालोय.. पण एक सांगतो मी अत्यंत संतप्तही आहे. या देशात विमान वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवणारी भ्रष्ट लोक. Boeing आणि Air India यांनी या दुर्घटनेवर उत्तर दिलं पाहिजे आणि जबाबदारी घेतलीच पाहिजे. लोकांच्या जीवाशी खेळ जात आहे".

पुढे त्यानं लिहलं, "जुनी, तांत्रिकदृष्ट्या मागे पडलेली विमाने अजूनही सेवेत आहेत, याला कोण जबाबदार? शक्य आहे की मी तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असेनही. पण, खरंच मनात अनेक भावना दाटून आल्या आहेत. त्या निष्पाप जीवांसाठी फार वाईट वाटतंय. Air India चे CEO, Boeing आणि DGCA डीजीसीएकडून या घटनेवर उत्तरं येणं अपेक्षित आहेत. फक्त शोकसंवेदना पुरेश्या नाहीत. गेलेले लोक पुन्हा येणार नाहीयेत" या शब्दात अभिनेत्याने दु:ख व्यक्त केलय. 

एकच जण बचावलाय
अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातात एक नागरिक बचावला आहे.  विमान कोसळल्यानंतर त्यातील इंधनामुळे भीषण आग लागली, ज्यात सर्वांचा जळून मृत्यू झाला. मात्र, रमेश विश्वास नावाचा ब्रिटीश तरुण या भीषण अपघातातून वाचला आहे.  दूरदर्शनसोबत बोलताना त्याने घटनाक्रम सांगितला. तो म्हणाला, "विमानाचा ज्या भागात माझी सीट होती तो भाग इमारतीच्या खालच्या भागाला धडकला असावा. वरच्या भागात आग लागली होती, तिथे बरेच लोक अडकले होते. कदाचित मी सीटसह खाली पडलो. मी कसा तरी बाहेर पडण्यात यशस्वी झालो. दरवाजा तुटलेला होता आणि मला समोर काही रिकामी जागा दिसली, म्हणून मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला", असे विश्वासकुमारने सांगितले. दरम्यान, या अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी), तसेच अमेरिका आणि ब्रिटनमधील पथकांकडून आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार केली जात आहे.

Web Title: Ahmedabad Air India Plane Crash Pushkar Jog Gets Angry Shares Says Boeing And Air India Have To Answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.