एरिका फर्नांडिसने सोडली 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' मालिका, चाहत्यांना सांगितले कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 03:30 PM2021-10-28T15:30:00+5:302021-10-28T15:30:47+5:30
'कुछ रंग प्यार के ऐसे भी' मालिकेत सुप्रिया पिळगांवकर, एरिका फर्नांडिस आणि शहीर शेख यांच्या मुख्य भूमिका होत्या.
![Erica Fernandes quits Kuch Rang Pyaar Ke Aese Bhi;Know The Reason | एरिका फर्नांडिसने सोडली 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' मालिका, चाहत्यांना सांगितले कारण Erica Fernandes quits Kuch Rang Pyaar Ke Aese Bhi;Know The Reason | एरिका फर्नांडिसने सोडली 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' मालिका, चाहत्यांना सांगितले कारण](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/erica-feature_202110712433.jpg)
एरिका फर्नांडिसने सोडली 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' मालिका, चाहत्यांना सांगितले कारण
छोट्या पडद्यावर हिंदी मालिका 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' रसिकांची आवडती मालिका आहे. मालिकेच्या दोन्ही सिझनलाही खूप चांगली पसंती मिळाली होती. मालिकेच्या पहिल्या भागापासूनच रसिकांनी मालिकेला पसंती दिली होती. मालिकेत सुप्रिया पिळगांवकर, एरिका फर्नांडिस आणि शहीर शेख यांच्या मुख्य भूमिका होत्या. पहिला आणि दुसऱ्या भागाला मिळालेल्या पसंती मुळेच मालिका पुन्हा नवीन ढंगात रसिकांच्या भेटीला आली होती. मालिकेत सोनाक्षी भूमिकेत एरिका फर्नांडिस झळकत होती. तिच्या भूमिकेला चांगलीच पसंती मिळाली होती. मात्र आता एरिकाने ही मालिका सोडल्याचे समोर आले आहे. मालिका सोडण्यामागचे कारणही तिने सांगितले आहे.
मालिका सोडल्याने एरिकाचे चाहते नाराज झाले आहेत. मालिका सोडण्याचे कारण तिला विचारत होते. अखेर तिने यावर मौन सोडले आहे. सोशल मीडियावर तिने तिच्या मालिका सोडण्याचे कारण सांगितले आहे. भली मोठी पोस्ट तिने शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने म्हटले की, मालिकेच्या पहिल्या दोन सिझनमध्ये भूमिकेला एक वेगळेच महत्त्व होते. तिसऱ्या भागात मात्र सोनाक्षी ही भूमिका खूपच कन्फुज दाखवण्यात आली होती. भूमिकेत फार काही दम नव्हता.
आजही आठवते मालिकेचा पहिला सीजन ऑफ-एयर झाला होता. तेव्हा चाहत्यांच्या आग्रहामुळे महिन्याभरातच मालिका पुन्हा सुरु करण्यात आली होती. रसिकांचे मिळणारे प्रेम पाहून आम्ही सगळेच थक्क होतो. सोनाक्षी भूमिका फक्त माझ्यासाठी नाही तर रसिकांसाठीही खास बनली होती.पहिल्या दोन सिझनमध्ये सोनाक्षी खूप स्ट्राँग आणि स्मार्ट दाखवण्यात आली होती.तिसऱ्या सिझनमध्येही अशीच काहीशी भूमिका असावी असे वाटले होते. पण तसे झाले नाही. याउलट ती खूप कमकुवत अशी दाखवण्यात आली होती. रसिकांनी पहिल्या दोन सिझनमधल्या सोनाक्षीलाच कायम स्मरणात ठेवावे जी 'स्ट्रॉन्ग सोनाक्षी' होती असेही तिने म्हटलं आहे.
एक कलाकार म्हणून कधी कधी तुम्हाला असे काही निर्णय घ्यावे लागतात. जेव्हा तुम्हाला सेल्फ-रिस्पेक्ट आणि मालिकेवरचे तुमचे असलेले प्रेम दोघांपैकी एक निवडावे लागते.दुसऱ्यांच्या जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर उचलून किती दिवस राहणार.अखेर योग्य तो निर्णय घेत मालिकेला गुड बाय केल्याचे तिने म्हटले आहे.