​करण जोहरलाही का वाटते भीती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 16:48 IST2016-12-31T16:48:21+5:302016-12-31T16:48:21+5:30

रोमँटिक व ड्रामा चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेल्या करण जोहरने अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. तो आपल्या चित्रपटातून गंभीर विषयावर ...

Why do you think Karan Johar is afraid? | ​करण जोहरलाही का वाटते भीती?

​करण जोहरलाही का वाटते भीती?

ong>रोमँटिक व ड्रामा चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेल्या करण जोहरने अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. तो आपल्या चित्रपटातून गंभीर विषयावर मत का मांडत नाही, याबाबत त्याच्यावर टीका करण्यात येते. याचा खुलासा खुद्द करण जोहरनेच केला आहे. आपल्या चित्रपटात गंभीर विषयावर चर्चा करण्याची भीती वाटत असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे. 

करण जोहर यांने एका कार्यक्रमात आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. चित्रपटात गंभीर विषयांवर चर्चा करताना करण जोहर म्हणाला, ‘माझी विचारधारा उदारमतवादी आहे व ती तशीच राहील. मात्र, मला हे विचार स्वतंत्रपणे व्यक्त करताना भीती वाटते. मी अनेक गोष्टींचा विचार करताना तो आधुनिक व विकसित पद्धतीने करतो. मी त्याची अनुभूती करू शकतो, त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. मला असे वाटते की मी अशा पाशवी मानसिकतेच्या मूक समाजात सामील झालो आहे.’

why karan Johar has feared?

मला आपल्या चित्रपटातून एखाद्या विषयावर मत व्यक्त करताना अधिक भीती वाटते जेव्हा माझा चित्रपट रिलीज होत असतो. मी या पृथ्वीवरील सर्वाधिक जोखिम असलेला व सर्वाधिक असुरक्षित व्यक्ती आहे. मला वाटते याला व्यावसायिक पद्धतीने सामोरे जाता येणार नाही. मी कमी वयातच हे पाहिले आहे की, तुम्ही एखाद्याचे सल्लागार, मार्गदर्शक, समीक्षक आणि सर्वकाही असू शकता पण, भीती सतत तुमच्या मनात घर करून असते. 

why karan Johar has feared?

करण जोहर याच्या २०१६ साली प्रदर्शित झालेला ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटातबाबत चांगलाच वाद निर्माण झाला होता. पाकिस्तानी कलावंत असल्याने हा वाद चिघळला गेला. आता पुन्हा पाक कलावंत असलेला शाहरुख खानचा चित्रपट प्रदर्शित होत आहे अशावेळी करणने व्यक्त केलेले मत बºयाच गोष्टी सांगून जाते. 

Web Title: Why do you think Karan Johar is afraid?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.