'गदर २' बनवण्यासाठी दिग्दर्शक अनिल शर्मांना का लागले २२ वर्षे?, समोर आलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 20:10 IST2023-06-22T20:09:50+5:302023-06-22T20:10:39+5:30
Gadar 2 : सनी देओल आणि अमिषा पटेलचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'गदर २' यावर्षी ११ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

'गदर २' बनवण्यासाठी दिग्दर्शक अनिल शर्मांना का लागले २२ वर्षे?, समोर आलं कारण
सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल(Amisha Patel)चा बहुप्रतीक्षित चित्रपट 'गदर २' यावर्षी ११ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट देखील या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान, 'गदर: एक प्रेम कथा' (Gadar Movie) या इतिहास घडवणाऱ्या चित्रपटाचा दुसरा भाग येण्यासाठी इतका वेळ का लागला हे चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितले आहे.
२००१ साली जेव्हा 'गदर' प्रदर्शित झाला, तेव्हा सर्वांच्या ओठावर फक्त तारा सिंग आणि सकिना यांचेच नाव होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता लवकरच प्रेक्षकांना तारा-सकिनाची प्रेमकथा पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. 'गदर २'मध्ये निर्माते १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाची पुनरावृत्ती करणार आहेत. चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांच्या उत्सुकतेची पातळी पूर्वीपेक्षा अधिकच वाढली आहे. सनी देओल गदर २ मध्ये तारा सिंग या व्यक्तिरेखेने लोकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. पण ब्लॉकबस्टर असल्याने चित्रपटाचा दुसरा भाग येण्यास इतका वेळ का लागला? आता खुद्द दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी याचा खुलासा केला आहे.
नाकारल्या होत्या ५० कथा
चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी ईटाइम्स ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की त्यांच्याकडे गदर २ साठी अनेक कथा आहेत. पण तिने लिहिलेल्या सर्व कथा दिग्दर्शकाच्या पसंतीस पडली नाही. अंतिम स्क्रिप्टच्या आधी दिग्दर्शकाने ५० कथा नाकारल्या होत्या, त्यांना गदरच्या ब्रँड नावावर चित्रपट बनवायचा नव्हता, तर तारा सिंग आणि सकिना यांची खरी कहाणी प्रेक्षकांसमोर मांडायची होती, जी त्यांची कथा पुढे नेऊ शकते. जवळपास ५० कथा ऐकल्यानंतर त्यांच्या मनात या कथेची घंटा वाजली आणि हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांना २२ वर्षे लागली.
अखेर मिळाली गदर २ साठी कथा
पुढे अनिल शर्मा म्हणाले की, एके दिवशी त्यांचे सह-लेखक शक्तीमान त्यांच्या घरी भेटायला आले आणि त्यांनी २ मिनिटे मागितली आणि सांगितले की, गदर २ साठी त्यांच्याकडे खूप छान कथा आहे. त्यावेळी त्यांचा चेहरा पाहून अनिल शर्मा यांनी अंतिम स्क्रिप्ट निवडली. शक्तीमान यांच्यासोबत काम केलेले अनिल यांना माहित होते की ही कथा शक्तिशाली आणि नेत्रदीपक असणार आहे. यानंतर त्यांनी सनी देओल आणि झी स्टुडिओसह कथा शेअर केली, कथेनेने सर्वांच्या हृदयाला स्पर्श केला. अनिल शर्मा यांनी असेही फायनल केले की सनी देओल आणि अमिषा पटेल पार्ट २ मध्ये मुख्य भूमिकेत असतील.