'रमन राघव 2.0' या सिनेमातून मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषनं बॉलीवुडमध्ये एंट्री केलीय. अमृताच्या फॅन्ससाठी तिचं हे बॉलीवुडचं पदार्पण म्हणजे एक प्रकारे ...
'रमन राघव 2.0' सिनेमासाठी अमृताचं भूमिका निवडीचं गुपित काय ?
n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">'रमन राघव 2.0' या सिनेमातून मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषनं बॉलीवुडमध्ये एंट्री केलीय. अमृताच्या फॅन्ससाठी तिचं हे बॉलीवुडचं पदार्पण म्हणजे एक प्रकारे ट्रीटच होती. मात्र रुपेरी पडद्यावर हा सिनेमा झळकताच अमृताच्या फॅन्सची निराशा झाली. या सिनेमात अमृताचं अवघ्या काही मिनिटांसाठी दर्शन होतं. त्यामुळं अमृताच्या फॅन्सचा हिरमोड झालाय. मात्र याबाबत विचारलं असता अमृता मात्र आपल्या भूमिकेवर समाधानी आहे. या सिनेमातील भूमिका छोटी असली तरी त्या भूमिकेचं सिनेमाच्या दृष्टीनं फार महत्त्व होतं असं अमृताला वाटतं. तिच्या दृष्टीने भूमिका किती मोठी हे महत्त्वाचं नसून तिचा दर्जा कसा आहे हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं आता अमृताच्या या स्पष्टीकरणानंतर तिच्या फॅन्सचं समाधान झालं असेल असं मानायला हरकत नाही.
Web Title: What is the secret of selection of Amrita's role for Raman Raghav 2.0?