'मला दिलेलं वचन कधीच पूर्ण केलं नाही'; विवेकने सांगितलं ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअपमागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 11:06 AM2023-12-14T11:06:21+5:302023-12-14T11:07:02+5:30

Vivek oberoi: सध्या सोशल मीडियावर विवेकची एक जुनी मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये त्याने ऐश्वर्यासोबत असलेल्या नात्यावर भाष्य केलं आहे.

vivek-oberoi-opens-up-about-past-relationships-takes-a-dig-at-ex-aishwarya-rai | 'मला दिलेलं वचन कधीच पूर्ण केलं नाही'; विवेकने सांगितलं ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअपमागचं कारण

'मला दिलेलं वचन कधीच पूर्ण केलं नाही'; विवेकने सांगितलं ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअपमागचं कारण

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय ( Vivek oberoi) आणि ऐश्वर्या राय-बच्चन (aishwarya rai) यांचं रिलेशनशीप कलाविश्वात चांगलं गाजलं. ऐश्वर्यामुळेच विवेकने सलमान खानसोबत पंगाही घेतला. मात्र, ऐनवेळी ऐश्वर्यानेही त्याच्याकडे पाठ फिरवली आणि अभिषेकसोबत संसार थाटला. विवेक अनेक मुलाखतींमध्ये ऐश्वर्यासोबत असलेल्या नात्यावर भाष्य केलं आहे. परंतु, ऐश्वर्याने कायमच याविषयी मौन बाळगलं. मात्र, पुन्हा एकदा विवेकने अप्रत्यक्षपणे या नात्यावर भाष्य केलं आहे.


सध्या सोशल मीडियावर विवेकची एक जुनी मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये त्याने ऐश्वर्यासोबत असलेल्या नात्यावर भाष्य केलं आहे. इतंकच नाही तर काही लोक दिलेली वचन मोडतात, असंही तो म्हणाला आहे. ऐश्वर्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर विवेकच्या करिअरलाही ब्रेक लागला. तो फारसा कोणत्याच प्रोजेक्टमध्ये झळकला नाही.  ज्या काही प्रोजेक्टमध्ये काम केलं ते सुद्धा बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकले नाहीत. परंतु, ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केल्यानंतर विवेकही त्याच्या आयुष्यात पुढे वळला आणि त्यानेही संसार थाटला. या सगळ्यावर त्याने एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं. सोबतच मला धमक्या मिळत होत्या असा धक्कादायक खुलासाही त्याने केला.

नेमकं काय म्हणाला विवेक?

"ऐश्वर्याला डेट करत असताना हे नातं तोडावं यासाठी मला सतत धमक्या येत होत्या.  तसं मला जबाबदारी झटकण्याची किंवा दिलेलं वचन मोडायची सवय नाही. पण, लोकांनी मला दिलेलं वचन कधीच पूर्ण केलं नाही. त्यांनी तसा प्रयत्नही केला नाही. अनेक गर्लफ्रेंडसही आल्या होत्या", असं विवेक म्हणाला.  

दरम्यान, विवेकने इथे ऐश्वर्याचं नाव न घेता तिने वचन मोडलं असं अप्रत्यक्षपणे म्हटलं. 'हम दिल दे चुके सनम'च्या सेटवर विवेकची ऐश्वर्या आणि सलमानसोबत भेट झाली होती. त्यानंतर सलमानसोबत ब्रेकअप झालेल्या ऐश्वर्याला विवेकने आधार दिला. त्यामुळे दोघांमध्येही जवळीक वाढली. परिणामी, त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. मात्र, त्यांचंही नातं फाक काळ टिकलं नाही.

Web Title: vivek-oberoi-opens-up-about-past-relationships-takes-a-dig-at-ex-aishwarya-rai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.