'हेरा फेरी ३'च्या वादात परेश रावल यांचं सुनील शेट्टीनं केलं कौतुक, खास पोस्ट करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:48 IST2025-05-30T13:48:14+5:302025-05-30T13:48:57+5:30
'हेरा फेरी ३'च्या वादात परेश रावल यांचं त्यांचा सहकलाकार सुनील शेट्टीनं कौतुक केलंय.

'हेरा फेरी ३'च्या वादात परेश रावल यांचं सुनील शेट्टीनं केलं कौतुक, खास पोस्ट करत म्हणाला...
Sunil Shetty Praised Paresh Rawal: 'हेरा फेरी ३' मधून बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांच्या बाहेर पडण्याच्या बातमीनं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. परेश यांनी अचानक चित्रपटातून माघार घेतल्याने निर्माता असणाऱ्या अक्षय कुमारने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. अक्षयच्या निर्मिती संस्थेकडून परेश यांना २५ कोटींची नोटीस बजावली होती. परेश यांनीदेखील आपल्या वकिलांमार्फत नोटीसला उत्तर पाठवलं आणि सोबतच शूटिंगसाठी आगाऊ घेतलेले ११ लाख रुपये व्याजासह परत केले. परेश यांनी सिनेमातून माघार घेतल्यानंतर त्यांना मनवण्याचे चाहत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 'हेरा फेरी ३'मुळं परेश चर्चेत असताना परेश यांचं त्यांचा सहकलाकार सुनील शेट्टीनं कौतुक केलंय.
'हेरा फेरी ३' वादाच्या पार्श्वभूमीवरही आज परेश रावल यांच्या वाढदिवसानिमित्त सुनील शेट्टीनं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर)वर परेश रावल यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहलं, "त्या माणसासाठी... जो बुद्धी आणि विनोदाचा संगम आहे आणि त्याहूनही अधिक एक अद्वितीय माणूस आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्याबद्दल मनात नेहमीच प्रेम आणि आदर आहे", या शब्दात शुभेच्छा दिल्या.
To the man... Who is a powerhouse of both Wit & Wisdom and an even more wonderful human being.
— Suniel Shetty (@SunielVShetty) May 30, 2025
Happy happy birthday Pareshji. Much love and respect always. @SirPareshRawalpic.twitter.com/KRDP0kSCql
परेश यांनी सिनेमा सोडताच काय होती सुनील शेट्टीची प्रतिक्रिया?
सुनील शेट्टीने परेश रावल यांच्या सिनेमातील एक्झिटवर भावुक प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला होता, "आम्ही 'हेरा फेरी ३'च्या प्रोमोचं शूटिंग केलं होतं. मी, परेश आणि अक्षय त्यावेळी होतो. असं वाटलंच नाही की, २५ वर्षांनंतर आम्ही तिघं प्रियदर्शनसोबत 'हेरा फेरी ३'साठी एकत्र आलोय. आमच्या तिघांमधली केमिस्ट्री, समजूतदारपणा खूप कमाल आहे. त्यामुळे परेशजींच्या या निर्णयाने मला धक्का बसला".