'हा' सुपरस्टार लवकर बरा व्हावा म्हणून श्रीदेवी यांनी केले होते एक आठवडा व्रत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 17:01 IST2018-02-27T11:31:41+5:302018-02-27T17:01:41+5:30
बॉलिवूडची चांदनी निखळली आहे या गोष्टीवर विश्वास ठेवणे अजूनही अनेकांना शक्य नाही. श्रीदेवी यांनी फक्त बॉलिवूड नाही तर साऊथमध्ये ...
.jpg)
'हा' सुपरस्टार लवकर बरा व्हावा म्हणून श्रीदेवी यांनी केले होते एक आठवडा व्रत
ब लिवूडची चांदनी निखळली आहे या गोष्टीवर विश्वास ठेवणे अजूनही अनेकांना शक्य नाही. श्रीदेवी यांनी फक्त बॉलिवूड नाही तर साऊथमध्ये ही अनेक सुपरस्टार्स सोबत काम केले होते. त्यापैकी एक आहेत रजनीकांत. श्रीदेवी यांच्या निधनांमुळे रजनीकांत दुखी झाले आहेत. श्रीदेवी यांच्या निधनाचे वृत्त समजताच हातातील सगळी काम सोडून रजनीकांत हे अनिल कपूर यांच्या घरी येऊन गेले. श्रीदेवी आणि रजनीकांत यांच्यात घनिष्ठ मैत्रीचे संबंध होते. यामागचे एक खास कारण आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, रजनीकांत हे एकदा आजारी पडले होते. त्यावेळी श्रीदेवी यांनी त्याच्या प्रकृतीसाठी एक आठवडा व्रत केले होते ऐवढेच नाही तर च्या पुण्यातील साई बाबा मंदिरात रजनीकांत यांना लवकर बरं वाटावं म्हणून प्रार्थने करायला देखील गेल्या होत्या. 2011मध्ये रजनीकांत राणा चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आजारी पडले होते. त्यांना पुढील उपचारासाठी सिंगापूरला नेण्यात आले होते. त्यादरम्यान त्यांची प्रकृती फारच गंभीर झाली होती.
ALSO READ : श्रीदेवीने आपल्या दोन्ही मुलींचे असे टोपणनाव ठेवले होते, जे वाचून तुम्ही भावुक व्हाल!
श्रीदेवी यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीचे प्रचंड नुकसान झाले आहे. श्रीदेवी यांचे पार्थिव कोणत्याही क्षणी त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात येऊ शकते. इंडिया इन दुबई या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्वीटद्वारे सांगण्यात आले आहे की, मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे दुबई पोलिसांनी दिलेली आहेत. त्यामुळे पार्थिव कुटुंबियांना सोपवण्याची औपचारिकता लवकरच पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे आज रात्रीपर्यंत श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत घेऊन देण्यात येईल असे सूत्रांकडून समजतेय. श्रीदेवी यांचे पार्थिव अनिल अंबानी यांच्या चार्टड विमानाने मुंबईत आणले जाणार आहे. त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी सध्या मुंबईत सुरू आहे. उद्या सकाळी ८ ते १० या दरम्यान अंतिम दर्शनासाठी पार्थिव वर्सोवा येथील श्रीदेवीच्या बंगल्यात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम यात्रेला सुरुवात होईल. बोनी कपूर तर या सगळ्या प्रकरणामुळे चांगलेच खचून गेले आहेत. त्यामुळे त्यांचा मुलगा अर्जुन कपूर हा वडिलांना आधार देण्यासाठी सकाळीच दुबईला रवाना झाला आहे सध्या तो वडिलांनासोबत दुबईत आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, रजनीकांत हे एकदा आजारी पडले होते. त्यावेळी श्रीदेवी यांनी त्याच्या प्रकृतीसाठी एक आठवडा व्रत केले होते ऐवढेच नाही तर च्या पुण्यातील साई बाबा मंदिरात रजनीकांत यांना लवकर बरं वाटावं म्हणून प्रार्थने करायला देखील गेल्या होत्या. 2011मध्ये रजनीकांत राणा चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आजारी पडले होते. त्यांना पुढील उपचारासाठी सिंगापूरला नेण्यात आले होते. त्यादरम्यान त्यांची प्रकृती फारच गंभीर झाली होती.
ALSO READ : श्रीदेवीने आपल्या दोन्ही मुलींचे असे टोपणनाव ठेवले होते, जे वाचून तुम्ही भावुक व्हाल!
श्रीदेवी यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीचे प्रचंड नुकसान झाले आहे. श्रीदेवी यांचे पार्थिव कोणत्याही क्षणी त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात येऊ शकते. इंडिया इन दुबई या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्वीटद्वारे सांगण्यात आले आहे की, मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे दुबई पोलिसांनी दिलेली आहेत. त्यामुळे पार्थिव कुटुंबियांना सोपवण्याची औपचारिकता लवकरच पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे आज रात्रीपर्यंत श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत घेऊन देण्यात येईल असे सूत्रांकडून समजतेय. श्रीदेवी यांचे पार्थिव अनिल अंबानी यांच्या चार्टड विमानाने मुंबईत आणले जाणार आहे. त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी सध्या मुंबईत सुरू आहे. उद्या सकाळी ८ ते १० या दरम्यान अंतिम दर्शनासाठी पार्थिव वर्सोवा येथील श्रीदेवीच्या बंगल्यात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम यात्रेला सुरुवात होईल. बोनी कपूर तर या सगळ्या प्रकरणामुळे चांगलेच खचून गेले आहेत. त्यामुळे त्यांचा मुलगा अर्जुन कपूर हा वडिलांना आधार देण्यासाठी सकाळीच दुबईला रवाना झाला आहे सध्या तो वडिलांनासोबत दुबईत आहे.