या कारणामुळे श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यात उडायचे खटके !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 12:31 IST2018-02-28T07:01:48+5:302018-02-28T12:31:48+5:30
सुपरस्टार श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनानंतर अनेकांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. लग्नासाठी दुबईला गेलेल्या श्रीदेवी परत आल्या त्या सफेद ...

या कारणामुळे श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यात उडायचे खटके !
स परस्टार श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनानंतर अनेकांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. लग्नासाठी दुबईला गेलेल्या श्रीदेवी परत आल्या त्या सफेद कपड्यात. या वादळाची पुसटशी कल्पनाही कोणाला नसेल. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर अनेक गुपितंही समोर येतायेत जी आजपर्यंत कोणालाच माहिती नव्हती. त्यातलं एक गुपितं म्हणजे श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यात अनेकदा वाद व्हायचा. त्याचं कारण होतं बोनी कपूर यांची पहली पत्नी मोना कपूर आणि त्यांची मुलं.
श्रीदेवी ज्यावेळी बोनी कपूर यांच्या आयुष्यात आल्या तेव्हा त्यांचे लग्न मोना कपूर यांच्याशी झाले होते. त्यामुळे मोना कपूर यांच्या मनात श्रीदेवी यांच्याबद्दल राग होता. तसेच मोना कपूर यांची आई निर्मात्या सत्ती शौरी यादेखील श्रीदेवी यांचा राग करायच्या. ज्यावेळी मोना कपूर यांना सोडून बोनी कपूर यांनी श्रीदेवींशी विवाह केला होता तेव्हा सत्ती शौरी श्रीदेवींना मारायला त्यांच्या अंगावर धावल्या होत्या आणि त्यावेळी श्रीदेवी गरोदर होत्या. नंतर काही दिवसांनी जान्हवीचा जन्म झाला. पण श्रीदेवी या ही गोष्ट कधीच विसरू शकल्या नव्हत्या.
ज्यावेळी सत्ती शौरी यांचे निधन झाले. तेव्हा बोनी कपूर अंतिम दर्शनाला गेले होते. ही गोष्ट श्रीदेवींना अजिबात आवडली नव्हती. यावरुन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण देखील झाले होते. ऐवढेच नाही तर ज्यावेळी अर्जुन कपूर आई म्हणजेच मोना कपूर यांचे निधन झाले तेव्हा श्रीदेवी आणि त्यांची दोन्ही मुली अंतिम दर्शनासाठी गेल्या नव्हत्या.
ALSO READ : श्रीदेवी यांचे पार्थिव पाहिल्यानंतर जान्हवी आणि खुशीची झाली अशी अवस्था
मुबारकाँ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या एका इंटरव्हु दरम्यान अर्जुन कपूरनंही श्रीदेवी आणि तिच्या मुलींशी माझे काही संबंध नाहीत, आणि त्यांच्याविषयी माझ्या मनात कटुताही नाही, असं म्हटलं होतं. मात्र श्रीदेवी यांचे निधन झाल्यानंतर अर्जुन कपूरने घरातल्या मोठ्या मुलाची जबाबदारी पार पडली. मंगळवारी सकाळी अर्जून आपल्या बोनी कपूर चांगलेच खचून गेले आहेत. त्यामुळे त्यांना आधार देण्यासाठी तो गेला होता. आजही अर्जुन कपूर आपल्या दोनही बहिणसोबत सेलिब्रेशन क्लबमध्ये उभा आहे. जिथे श्रीदेवी यांचे पार्थिव ठेवण्यात आले आहे.
श्रीदेवी ज्यावेळी बोनी कपूर यांच्या आयुष्यात आल्या तेव्हा त्यांचे लग्न मोना कपूर यांच्याशी झाले होते. त्यामुळे मोना कपूर यांच्या मनात श्रीदेवी यांच्याबद्दल राग होता. तसेच मोना कपूर यांची आई निर्मात्या सत्ती शौरी यादेखील श्रीदेवी यांचा राग करायच्या. ज्यावेळी मोना कपूर यांना सोडून बोनी कपूर यांनी श्रीदेवींशी विवाह केला होता तेव्हा सत्ती शौरी श्रीदेवींना मारायला त्यांच्या अंगावर धावल्या होत्या आणि त्यावेळी श्रीदेवी गरोदर होत्या. नंतर काही दिवसांनी जान्हवीचा जन्म झाला. पण श्रीदेवी या ही गोष्ट कधीच विसरू शकल्या नव्हत्या.
ज्यावेळी सत्ती शौरी यांचे निधन झाले. तेव्हा बोनी कपूर अंतिम दर्शनाला गेले होते. ही गोष्ट श्रीदेवींना अजिबात आवडली नव्हती. यावरुन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण देखील झाले होते. ऐवढेच नाही तर ज्यावेळी अर्जुन कपूर आई म्हणजेच मोना कपूर यांचे निधन झाले तेव्हा श्रीदेवी आणि त्यांची दोन्ही मुली अंतिम दर्शनासाठी गेल्या नव्हत्या.
ALSO READ : श्रीदेवी यांचे पार्थिव पाहिल्यानंतर जान्हवी आणि खुशीची झाली अशी अवस्था
मुबारकाँ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या एका इंटरव्हु दरम्यान अर्जुन कपूरनंही श्रीदेवी आणि तिच्या मुलींशी माझे काही संबंध नाहीत, आणि त्यांच्याविषयी माझ्या मनात कटुताही नाही, असं म्हटलं होतं. मात्र श्रीदेवी यांचे निधन झाल्यानंतर अर्जुन कपूरने घरातल्या मोठ्या मुलाची जबाबदारी पार पडली. मंगळवारी सकाळी अर्जून आपल्या बोनी कपूर चांगलेच खचून गेले आहेत. त्यामुळे त्यांना आधार देण्यासाठी तो गेला होता. आजही अर्जुन कपूर आपल्या दोनही बहिणसोबत सेलिब्रेशन क्लबमध्ये उभा आहे. जिथे श्रीदेवी यांचे पार्थिव ठेवण्यात आले आहे.