शाहरूख खानने बदलले मुंबईच्या चर्मकाराचे आयुष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 17:04 IST2017-01-06T17:04:00+5:302017-01-06T17:04:00+5:30

सुपरस्टार शाहरूख खान याला ‘बी टाऊन’चा ‘किंग खान’,‘बादशाह’ म्हणून ओळखले जाते. मात्र, त्याचा बॉलिवूडमध्ये येण्याअगोदरचा प्रवास अत्यंत खडतर होता. ...

Shah Rukh Khan changed Mumbai's life! | शाहरूख खानने बदलले मुंबईच्या चर्मकाराचे आयुष्य!

शाहरूख खानने बदलले मुंबईच्या चर्मकाराचे आयुष्य!

परस्टार शाहरूख खान याला ‘बी टाऊन’चा ‘किंग खान’,‘बादशाह’ म्हणून ओळखले जाते. मात्र, त्याचा बॉलिवूडमध्ये येण्याअगोदरचा प्रवास अत्यंत खडतर होता. त्याने केलेली मेहनत, जिद्द, समर्पण यांचे फळ त्याला आता मिळतेय. मात्र, शाहरूख खानमुळे कुणाला प्रेरणा मिळेल, असे तुम्हाला वाटते का? होय, शाम बहादूर रोहिदास या एका चर्मकाराचे आयुष्य शाहरूखकडून मिळालेल्या प्रेरणेमुळे बदलले आहे.

शाहरूखच्या आगामी ‘रईस’ चित्रपटातील ‘कोई धंदा छोटा नहीं होता और धंदे से बडा कोई धरम नहीं होता’ या डायलॉगमुळे प्रेरित होऊन ‘या’ चर्मकाराने स्वत:चं एक दुकान विकत घेतलं असून, आता तो स्वत:च्या मर्जीने त्याचा व्यवसाय करतोय. एका मुलाखतीत बोलताना तो म्हणतो, ‘माझे वडील एका फॅक्टरीत काम करत होते. तर अर्धवेळ चर्मकार म्हणून काम करीत असत. श्याम नोकरीच्या शोधात मुंबईत आला. क्राफ्टच्या स्किल्सवर त्याने स्वत:चे दुकान घेतले. सध्या तो त्याच्या मर्जीचा मालक आहे.’ ‘हर धंदा बडा होता हैं’ या शाहरूखच्या डायलॉगमुळे आज त्याला जगण्याचं सामर्थ्य मिळालंय.

शाहरूख खानचा आगामी चित्रपट ‘रईस’ मुळे तो चर्चेत आहे. त्यातील डायलॉगपासून ते गाण्यांपर्यंत सर्वच काही यूट्यूबवर हिट होत आहे. शाहरूख खान आणि चित्रपटाच्या टीमला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

{{{{twitter_post_id####}}}}





 

Web Title: Shah Rukh Khan changed Mumbai's life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.