"सेटवर प्रेमाचे वारे वाहत होते...", संजय लीला भन्साळींना आठवले 'हम दिल दे चुके सनम'चे दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 17:26 IST2025-06-18T17:25:18+5:302025-06-18T17:26:49+5:30

सिनेमाच्या सीक्वेलबाबत विचारल्यावर ते म्हणाले...

sanjay leela bhansali remembers hum dil de chuke sanam shooting days | "सेटवर प्रेमाचे वारे वाहत होते...", संजय लीला भन्साळींना आठवले 'हम दिल दे चुके सनम'चे दिवस

"सेटवर प्रेमाचे वारे वाहत होते...", संजय लीला भन्साळींना आठवले 'हम दिल दे चुके सनम'चे दिवस

संजय लीला भन्साळींच्या (Sanjay Leela Bhansali) गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'हम दिल दे चुके सनम'. ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांची रोमँटिक केमिस्ट्री, त्यांची अधुरी प्रेमकहाणी आणि अजय देवगणचा दमदार अभिनय यामुळे सिनेमा आजही सर्वांच्या लक्षात आहे. यातील प्रत्येक गाणी गाजली. या सिनेमाला २६ वर्ष पूर्ण झाल आहेत. आता नुकतंच संजय भन्साळींनी सेटवर सलमान-ऐश्वर्याची केमिस्ट्री कशी होती याचा खुलासा केला.

'हम दिल दे चुके सनम' सिनेमाच्या सेटवरच सलमान-ऐश्वर्या यांच्यातली जवळीक वाढली होती. सिनेमाचा शेवट तर सलमानला अजिबात आवडला नव्हता. सिनेमाच्या आठवणी शेअर करत ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत संजय लीला भन्साळी म्हणाले, "तेव्हा सेटवर प्रेमाचा वारे वाहत होते. फक्त सलमान-ऐश्वर्याच नाही तर इतर सर्वच स्टारकास्ट अतिशय प्रेमळ होती. जोहरा सहगल, हेलन, विक्रम गोखले, स्मिता जयकर, सलमान-ऐश्वर्या सगळेच कुटुंबासारखे राहायचे. अशी मजा मला अन्य कोणत्या सिनेमाच्या शूटिंग सेटवर आली नसेल."

सिनेमाच्या सीक्वेलबाबत विचारल्यावर ते म्हणाले, "याचा सीक्वेल बनवण्याची माझी इच्छा नाही. सिनेमाचा जो शेवट झाला तिथेच तो सोडून दिला पाहिजे. मला तसंही माझ्या कोणत्याच सिनेमाचा सीक्वेल बनवायची इच्छा नाही. पण संधी मिळालीच तर मी खामोशीचा बनवेन. कारण मला त्याचा शेवट वेगळा करायचा आहे."

'हम दिल दे चुके सनम' १९९९ साली रिलीज झाला. सलमान-ऐश्वर्याची केमिस्ट्री आजही लोक विसरलेले नाहीत. रोमँटिक सिनेमांमध्ये या सिनेमाचं नाव आवर्जुन येतं. आज इतक्या वर्षांनंतरही यातील गाणी ऐकली जातात. 

Web Title: sanjay leela bhansali remembers hum dil de chuke sanam shooting days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.