माझ्या मुलाने माझ्यासारखे बनू नये, हीच प्रार्थना करतो : संजय दत्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 14:42 IST2017-09-17T09:12:24+5:302017-09-17T14:42:24+5:30
ड्रग्जचे व्यसन आणि कायदेशीर प्रक्रियेचा सामना करावा लागलेला अभिनेता संजय दत्त त्याच्या मुलांप्रती खूपच संवेदनशील आहे. त्याच्या मते, माझा ...

माझ्या मुलाने माझ्यासारखे बनू नये, हीच प्रार्थना करतो : संजय दत्त
ड रग्जचे व्यसन आणि कायदेशीर प्रक्रियेचा सामना करावा लागलेला अभिनेता संजय दत्त त्याच्या मुलांप्रती खूपच संवेदनशील आहे. त्याच्या मते, माझा मुलगा माझ्यासारखा बनू नये हीच माझी अपेक्षा आहे, त्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो, असे त्याने म्हटले. काही दिवसांपूर्वीच संजय दत्त शिक्षा भोगून बाहेर आला असून, पुन्हा एकदा फिल्मी ट्रॅकवर परतला आहे. सध्या तो त्याच्या आगामी ‘भूमी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
दिवंगत अभिनेते सुनील दत्त आणि नर्गिस यांचा मुलगा अभिनेता संजय दत्त हा एकेकाळी ड्रग्जच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. त्यासाठी त्याला सुधारगृहात पाठविण्यात आले होते. परंतु १९९३ मध्ये मुंबईत घडलेल्या बॉम्बस्फोटानंतर त्याच्या घरात बेकायदेशीररीत्या बंदुका आढळून आल्या होत्या. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या स्फोटात २५० लोक मृत्युमुखी पडले होते, तर कित्येकजण गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी त्याला शिक्षाही भोगावी लागली. आता तो शिक्षा भोगून बाहेर आला असून, नव्याने आयुष्याला सुरुवात केली आहे.
![]()
गेल्या शनिवारी संजूबाबा इंडिया टुडे माइंड रॉक्स युथ संमेलनात सहभागी झाला होता. यावेळी त्याने आपल्या जीवनाचा प्रवास आणि संघर्ष सांगितला. यावेळी संजय दत्तला विचारण्यात आले की, तू मुलांच्या पालनपोषणाविषयी तुझ्या वडिलांशी तुझी तुलना कशी करतो? त्यावर उत्तर देताना त्याने म्हटले की, ‘माझ्या वडिलांनी माझे सर्वसामान्य मुलांप्रमाणे पालनपोषण केले. मला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठविण्यात आले होते. मला माझ्या आयुष्यात कठोर परिश्रम करावे लागले अन् माझ्या मुलांनीही परिश्रम करावे हीच माझी अपेक्षा आहे.’
पुढे बोलताना संजूबाबा म्हणाला की, ‘मी माझ्या मुलांना जीवनमूल्य शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्यावर संस्कार करताना त्यांना हे शिकवित आहे की, त्यांनी मोठ्यांचा आदर करावा, मग ते घरातील नोकर का असे ना. त्याचबरोबर मी प्रार्थना करीत आहे की, माझ्या मुलाने माझ्यासारखे बनू नये. कारण माझ्यामुळे माझ्या वडिलांना जो त्रास सहन करावा लागला, तो माझ्या मुलामुळे मला सहन करायचा नाही. संजूबाबाचे हे भावनात्मक उत्तर ऐकूण संगळेच दंग झाले. अनेकांनी संजूबाबाच्या या जाहीर वक्तव्याचे कौतुक केले.
![]()
संजूबाबा लवकरच उमंगकुमार दिग्दर्शित ‘भूमी’ या चित्रपटातून कमबॅक करीत आहे. हा चित्रपट वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, त्यास प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दिवंगत अभिनेते सुनील दत्त आणि नर्गिस यांचा मुलगा अभिनेता संजय दत्त हा एकेकाळी ड्रग्जच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. त्यासाठी त्याला सुधारगृहात पाठविण्यात आले होते. परंतु १९९३ मध्ये मुंबईत घडलेल्या बॉम्बस्फोटानंतर त्याच्या घरात बेकायदेशीररीत्या बंदुका आढळून आल्या होत्या. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या स्फोटात २५० लोक मृत्युमुखी पडले होते, तर कित्येकजण गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी त्याला शिक्षाही भोगावी लागली. आता तो शिक्षा भोगून बाहेर आला असून, नव्याने आयुष्याला सुरुवात केली आहे.
गेल्या शनिवारी संजूबाबा इंडिया टुडे माइंड रॉक्स युथ संमेलनात सहभागी झाला होता. यावेळी त्याने आपल्या जीवनाचा प्रवास आणि संघर्ष सांगितला. यावेळी संजय दत्तला विचारण्यात आले की, तू मुलांच्या पालनपोषणाविषयी तुझ्या वडिलांशी तुझी तुलना कशी करतो? त्यावर उत्तर देताना त्याने म्हटले की, ‘माझ्या वडिलांनी माझे सर्वसामान्य मुलांप्रमाणे पालनपोषण केले. मला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठविण्यात आले होते. मला माझ्या आयुष्यात कठोर परिश्रम करावे लागले अन् माझ्या मुलांनीही परिश्रम करावे हीच माझी अपेक्षा आहे.’
पुढे बोलताना संजूबाबा म्हणाला की, ‘मी माझ्या मुलांना जीवनमूल्य शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्यावर संस्कार करताना त्यांना हे शिकवित आहे की, त्यांनी मोठ्यांचा आदर करावा, मग ते घरातील नोकर का असे ना. त्याचबरोबर मी प्रार्थना करीत आहे की, माझ्या मुलाने माझ्यासारखे बनू नये. कारण माझ्यामुळे माझ्या वडिलांना जो त्रास सहन करावा लागला, तो माझ्या मुलामुळे मला सहन करायचा नाही. संजूबाबाचे हे भावनात्मक उत्तर ऐकूण संगळेच दंग झाले. अनेकांनी संजूबाबाच्या या जाहीर वक्तव्याचे कौतुक केले.
संजूबाबा लवकरच उमंगकुमार दिग्दर्शित ‘भूमी’ या चित्रपटातून कमबॅक करीत आहे. हा चित्रपट वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, त्यास प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.