"मुस्लिमांचा यात काहीही संबंध नाही...", पहलगाम हल्ल्यावर ५६ वर्षीय अभिनेत्रीची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 17:59 IST2025-04-28T17:58:50+5:302025-04-28T17:59:22+5:30
पहलगाममधील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यावर देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. 'आशिकी' फेम अभिनेत्री अनु अग्रवाल (Anu Agrawal)ने या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

"मुस्लिमांचा यात काहीही संबंध नाही...", पहलगाम हल्ल्यावर ५६ वर्षीय अभिनेत्रीची प्रतिक्रिया
पहलगाममधील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यावर देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यावर सलमान, शाहरुख, अक्षय कुमार, अनुपम खेर यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलिवूडमधून संन्यास घेतलेल्या नायिकेने या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजे 'आशिकी' फेम अभिनेत्री अनु अग्रवाल (Anu Agrawal). तिने ही घटना दुःखद असल्याचे म्हटले आहे.
आयएएनएसशी बोलताना अनु अग्रवाल म्हणाली, ''मला खूप दुःख वाटत आहे आणि या दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांना मी माझा पाठिंबा आहे.'' पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दर्शवत ती म्हणाली की, ''आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा जास्त शिक्षा दिली जाईल. अशा घटनेनंतर कोणीही गप्प बसणार नाही हे स्पष्ट आहे.''
अभिनेत्री मोदींबद्दल म्हणाली...
पंतप्रधानांवर विश्वास व्यक्त करताना अनु म्हणाली, ''माझा मोदींना पूर्ण पाठिंबा आहे आणि मला खात्री आहे की ते योग्य पाऊल उचलतील.'' ही घटना सुरक्षेतील त्रुटीमुळे घडली का असे विचारले असता ती म्हणाली की, ''जेव्हा जेव्हा अशी घटना घडते तेव्हा प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे असते की ते का आणि कसे घडले, परंतु काहीही झाले तरी त्यामागे अनेक कारणे असतात. काही लोक यासाठी सुरक्षेतील त्रुटींना जबाबदार धरत आहेत, तर काही लोक मुस्लिम समुदायाला जबाबदार धरत आहेत, ज्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. म्हणून, मी म्हणेन की लोकांनी प्रथम आत्मपरीक्षण करावे आणि स्वतःला सुधाराले पाहिजे.''
''प्रत्येक अडचण आपल्याला धडा शिकवते''
दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांसाठीचा संदेश शेअर करताना अनु अग्रवाल म्हणाली, ''आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण आपल्याला धडा शिकवते. आपल्या आत द्वेष वाढवण्याऐवजी, आपण परिस्थितीतून कसे बाहेर पडायचे याचा विचार केला पाहिजे. माझ्या अनुभवानुसार, सकारात्मकता हे एक उत्तम मलम आहे. ''
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला, ज्यामध्ये सुमारे २६ लोकांचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्माच्या आधारे वेगळे केले आणि त्यांचा धर्म जाणून घेतल्यानंतर त्यांना गोळ्या घातल्या. यानंतर, भारत सरकारने पर्यटन स्थळी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे आणि पाकिस्तानविरुद्ध ५ मोठी पावलेही उचलली आहेत.