‘इंदू सरकार’वर मधुर भांडारकर यांनी दिले मोठे बयान ! वाचा काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 13:05 IST2017-07-12T07:35:27+5:302017-07-12T13:05:27+5:30
मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे. स्वत: संजय गांधी यांची मुलगी असल्याचा दावा करणारी ...

‘इंदू सरकार’वर मधुर भांडारकर यांनी दिले मोठे बयान ! वाचा काय?
म ुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे. स्वत: संजय गांधी यांची मुलगी असल्याचा दावा करणारी प्रिया सिंह पॉल हिने या चित्रपटावर आक्षेप घेत, भांडारकर यांना नोटीस पाठवली आहे. सेन्सॉर बोर्डाचे म्हणाल तर, बोर्डाने या चित्रपटातील आरएसएस व अकाली यासारख्या शब्दांना गाळण्याचे निर्देश दिले आहे. शिवाय १२ कट आणि दोनठिकाणी डिस्क्लेमर देण्यासही सांगितले आहे. मधुर भांडारकर यांच्यासाठी हे अतिशय धक्कादायक आहे. त्यामुळे त्यांनी हा चित्रपट पुनर्निरीक्षण समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मला माझ्या चित्रपटात काहीही बदल करायचे नाहीत. कारण यामुळे माझ्या चित्रपटाचे सार प्रभावित होऊ शकते. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाच्या या निर्देशाविरोधात आम्ही पुनर्निरीक्षण समितीकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीकडून आम्हाला मंजूरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. असे झाले नाहीच तर मग आमच्याकडे अपिली न्यायाधिकरणाकडे जाण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही, असे भांडारकर यांनी म्हटले आहे.
‘भारत की एक बेटी ने देश को बंदी बनाया हुआ है’ आणि ‘ और तुम लोग जिंदगीभर मां-बेटे की गुलामी करते रहोगे’, यासारखे संवादही सेन्सॉर बोर्डाने काढायला सांगितले आहेत. सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले हे कट्स राजकीय दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे का? असे विचारले असता, हे मीडियाने त्यांना विचारायला हवे, असे उत्तर मधुर यांनी दिले. त्यामुळे येत्या काळात ‘इंदू सरकार’च्या घडामोडींकडे सगळ्यांचेच लक्ष असणार आहे.
या चित्रपटात नील नितीन मुकेश, किर्ती कुल्हारी, सुप्रिया विनोद, अनुपम खेर, तोता राय चौधरी आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
‘भारत की एक बेटी ने देश को बंदी बनाया हुआ है’ आणि ‘ और तुम लोग जिंदगीभर मां-बेटे की गुलामी करते रहोगे’, यासारखे संवादही सेन्सॉर बोर्डाने काढायला सांगितले आहेत. सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले हे कट्स राजकीय दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे का? असे विचारले असता, हे मीडियाने त्यांना विचारायला हवे, असे उत्तर मधुर यांनी दिले. त्यामुळे येत्या काळात ‘इंदू सरकार’च्या घडामोडींकडे सगळ्यांचेच लक्ष असणार आहे.
या चित्रपटात नील नितीन मुकेश, किर्ती कुल्हारी, सुप्रिया विनोद, अनुपम खेर, तोता राय चौधरी आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.