Friendship Day 2018 : कधीकाळी जीवलग मित्र असणारे हे स्टार्स आज पाहतही नाहीत एकमेकांचं तोंड!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 12:49 PM2018-08-02T12:49:11+5:302018-08-02T12:50:14+5:30

बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या अशा आहेत ज्यांच्या मैत्रिची उदाहरणे दिली जायची. पण आता त्यांच्यात इतका काही वाद निर्माण झालाय की, ते एकमेकांचा चेहरा पाहण्यातही इंटरेस्टेड नसतात.

Friendship Day 2018 : Bollywood's best friends who fell apart for some reason | Friendship Day 2018 : कधीकाळी जीवलग मित्र असणारे हे स्टार्स आज पाहतही नाहीत एकमेकांचं तोंड!

Friendship Day 2018 : कधीकाळी जीवलग मित्र असणारे हे स्टार्स आज पाहतही नाहीत एकमेकांचं तोंड!

googlenewsNext

नाती तयार होणे आणि बिघडणे ही बाब बॉलिवूड सामान्य आहे. कधी सिनेमे, वादग्रस्त विधाने किंवा पर्सनल लाइफमध्ये सुरु असलेल्या गोंधळामुळे चांगली नाती तुटतात. बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या अशा आहेत ज्यांच्या मैत्रिची उदाहरणे दिली जायची. पण आता त्यांच्यात इतका काही वाद निर्माण झालाय की, ते एकमेकांचा चेहरा पाहण्यातही इंटरेस्टेड नसतात. फ्रेन्डशिप डे च्या निमित्ताने जाणून घेऊ बॉलिवूडच्या या मित्रांबाबत जे आता दूर गेलेत....

काजोल आणि करन जोहर

करन आणि काजोल यांची मैत्री २५ वर्ष जुनी आहे. पण गेल्या वर्षी त्यांच्या नात्यात दरी निर्माण झाली. याचं कारण होतं करन आणि अजय देवगन यांच्या सिनेमातील क्लॅश. ए दिल है मुश्किल आणि शिवाय हे दोन्ही सिमेने एकाचवेळी रिलीज झाले होते. आपली मैत्री संपल्यावर करन म्हणाला होता की, कधी कधी चाप्टर संपतात. पुस्तकं संपतात. नातीही संपतात. पण काजोलने यावर कधीही काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर आपल्या कॉमेडी शोच्या माध्यमातून देशातच नाही तर जगभरात लोकप्रिय झाले होते. कॉमेडीच्या विश्वात या जोडीने प्रेक्षकांना भरपूर हसवलं. पण दोघांमधील भांडणामुळे दोघे वेगळे झाले. ऑस्ट्रेलियाहूप परत येताना कपिल आणि सुनीलमध्ये भांडण झालं. त्यानंतर सुनीलने शो सोडला आणि दोघांची मैत्री संपुष्टात आली. 

सोनम कपूर आणि रणबीर कपूर

'सावरिया' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणारे सोनम आणि रणबीर कधीकाळी बेस्ट फ्रेन्ड होते. असे सांगितले जाते की, करन जोहरच्या चॅट शोमध्ये सोनमने रणबीरबाबत एक वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे दोघांमध्ये वाद झाले. डेब्यू सिनेमाच्या सेटवरुन दोघांच्या अफेअरची चर्चाही झाली होती. पण आता दोघे एकमेकांसमोर येणेही टाळतात. 

सोनम कपूर आणि दीपिका पादुकोन

दोघींनी जवळपास सोबतच आपल्या करिअरची सुरुवात केली होती. दोघींची मैत्रीही चांगलीच गाजली होती. 'कॉफी विथ करन' मध्ये आलेल्या सोनम आणि दीपिकाच्या मैत्रीचं उदाहरणही दिलं जात होतं. दोघींनी या शोमधून रणबीर चांगलीच खिल्ली उडवली होती. ज्यामुळे वादही झाला होता. पण आता काही कारणांमुळे दोघींची मैत्री तुटली आहे. 

सलमान खान आणि संजय दत्त

सलमान खान आणि संजय दत्त यांची ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन मैत्री सर्वांनाच माहीत आहे. पण सध्या दोघांचं नातं बिनसलं आहे. असे सांगितले जाते की, संजय दत्त तुरुंगातून सुटला तेव्हा सलमान त्याला भेटायलाही गेला नव्हता. यामुळे संजय नाराज झाला होता. मैत्रीत आलेल्या या दुराव्यामुळे संजय दत्तने त्याची मॅनेजर रेशमा शेट्टीलाही नोकरीहून काढले होते. 

संजय लीला भन्साली आणि सलमान खान

संजय लीला भन्साली आणि सलमान खान या जोडीने 'खामोशी' आणि 'हम दिल दे चुके सनम' सिमेनासाठी एकत्र काम केलं होतं. या दोघांची ऑफस्क्रिन मैत्रीही चांगलीच लोकप्रिय होती. एका मुलाखतीत भन्साली म्हणाले होते की, 'कदाचित मी आता सलमानसोबत कधीही सिनेमा करणार नाही. जर एखादा वेगळा सिनेमा मी करत असेन आणि त्याल सलमान फिट बसत नसेल तर मी त्याला घेणार नाही'.
 

Web Title: Friendship Day 2018 : Bollywood's best friends who fell apart for some reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.