सासू सूनेचं बिनसलं? सोशल मीडियावर सुरु झाला कोल्ड वॉर; आलियाच्या पोस्टनंतर चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 10:27 AM2024-01-12T10:27:04+5:302024-01-12T10:28:14+5:30

सोशल मीडियावर सासू सूनेमधील भांडणाची चर्चा सुरु झाली आहे. 

alia bhatt and neetu kapoor cold war on social media after actress posts something cryptic | सासू सूनेचं बिनसलं? सोशल मीडियावर सुरु झाला कोल्ड वॉर; आलियाच्या पोस्टनंतर चर्चेला उधाण

सासू सूनेचं बिनसलं? सोशल मीडियावर सुरु झाला कोल्ड वॉर; आलियाच्या पोस्टनंतर चर्चेला उधाण

आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे बॉलिवूडमधील पॉवर कपल आहे. दोघांना राहा ही क्युट मुलगीही आहे. नुकतंच रणबीरने Animal हा सुपरहिट सिनेमा दिला. तर आलिया तिच्या आगामी 'जिगरा' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतंच Animal ची सक्सेस पार्टी झाली. यावेळी नीतू कपूर आणि आलिया भट यांच्यात काहीतरी बिनसल्याचं जाणवलं. यानंतर सोशल मीडियावर सासू सूनेमधील भांडणाची चर्चा सुरु झाली. 

नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी काही दिवसांपूर्वी लाडका मुलगा रणबीर कपूरचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये रणबीर आईच्या पायांची मालिश करताना दिसतोय. हा खास क्षण शेअर करताना त्यांनी लिहिले,'चंदा है तू, मेरा सूरज है तू...लेकीन इतना सीधा भी नही है तू'. नीतू कपूर यांच्या या पोस्टला आलियाची आई सोनी राजदान यांनी लाईक केले. मात्र आलियाने यावर कोणतीच रिअॅक्शन दिली नाही.

आता आलियाने भटने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीमधून तिने सासूला उत्तर दिल्याचं नेटकरी म्हणाले आहेत. आलियाने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये एपीजे अब्दुल कलाम यांचा एक सुविचार आहे. 'अगर तुम सूरज की तरह चमकना चाहते हो, तो पहले सूरज की तरह जलना सीखो.' 

या स्टोरीमधून आलियाचा इशारा सासूकडे आहे का असा अंदाज वर्तवला जात आहे. सासू-सूनेत कोल्ड वॉर सुरु असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियात रंगली आहे. तसंच Animal च्या सक्सेस पार्टीत आलिया आणि नीतू यांच्यात काहीतरी बिनसल्याचं सर्वांनाच जाणवत होतं. 

Web Title: alia bhatt and neetu kapoor cold war on social media after actress posts something cryptic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.