शाहरुखने काही मिनिटात ऐश्वर्याची 5 सिनेमातून केलेली हकालपट्टी, मुलाखतीत केला होता खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 01:25 PM2024-01-25T13:25:49+5:302024-01-25T13:26:22+5:30

वैयक्तिक आयुष्यातील वादळामुळे तिचं करिअरच धोक्यात आलं होतं.

aishwarya rai career was in trouble when she broke up with salman khan had exit from shahrukh khan s 5 films | शाहरुखने काही मिनिटात ऐश्वर्याची 5 सिनेमातून केलेली हकालपट्टी, मुलाखतीत केला होता खुलासा

शाहरुखने काही मिनिटात ऐश्वर्याची 5 सिनेमातून केलेली हकालपट्टी, मुलाखतीत केला होता खुलासा

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. याचं कारण म्हणजे तिचं सलमानसोबतचं असलेलं अफेअर. सलमान (Salman Khan)आणि ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र सलमानच्या ओव्हर पझेसिव्ह स्वभावामुळे त्यांच्यात भांडणे झाली. सलमानने ऐश्वर्यावर हात उचलल्याचंही बोललं गेलं. ऐश्वर्या या टॉक्झिक रिलेशनशिपमधून बाहेर पडली. मात्र तिच्या या वैयक्तिक आयुष्यातील वादळामुळे तिचं करिअरच धोक्यात आलं होतं. शाहरुख खानने (Shahrukh Khan)  तिला कोणतंही कारण न देता ५ मोठ्या सिनेमांमधून बाहेर काढलं होतं याचा खुलासा स्वत: ऐश्वर्याने केला होता. 

सिमी गरेवालच्या टॉक शोमध्ये ऐश्वर्याला विचारण्यात आलं की, 'वीर झारा सिनेमा तुला विचारात घेऊनच बनवण्यात आला होता. तसंच शाहरुखसोबत तू 5 सिनेमांमध्ये दिसणार होतीस. पण नंतर काय झालं की तू पाचही सिनेमांमधून बाहेर पडलीस?' यावर ऐश्वर्या म्हणाली,"हो, हे खरं आहे. आम्ही दोघांनी बरेच चित्रपट एकत्र साईन केले होते. पण अचानक सगळंच बदललं. याचं कारण मला कधीच सांगण्यात आलं नाही."

ती पुढे म्हणाली,"मी इतकंच सांगेन की चित्रपटातून बाहेर पडणं हा माझा निर्णय नव्हता. जेव्हा तुम्हाला कारणच कळत नाह तेव्हा तुम्ही स्वत:हूनच दुर्लक्ष करता. मी तेव्हा गोंधळले होते, मला खूप वाईट वाटलं होतं. पण माझा हा स्वभाव नाही की मी जाऊन कारण विचारेन. कारण एखाद्याला जर सांगायचं असेल तर त्याने ते आधीच सांगितलं असतं. पण मला कारणच कळलं नाही म्हणजेच त्याला ते सांगायचं नव्हतं."

ऐश्वर्या रायला तेव्हा 'वीर झारा', 'चलते चलते' या सिनेमांसाठी साईन करण्यात आलं होतं. मात्र ऐनवेळी 'वीर झारा' मध्ये प्रिती झिंटा साईन करण्यात आलं. इतकंच नाही तर 'चलते चलते'साठी ऐश्वर्याने शूटही सुरु केलं होतं. मात्र चालू शूटमधून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आणि राणी मुखर्जीला घेण्यात आलं. हे सर्व तेव्हाच घडलं ज्यावेळी ऐश्वर्याने सलमानशई नातं तोडलं होतं.

Web Title: aishwarya rai career was in trouble when she broke up with salman khan had exit from shahrukh khan s 5 films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.