"जुहीसोबत ७ वर्षं बोललोच नाही" आमिर खानचा खुलासा, जाणून घ्या कधी मिटलं होतं मग भांडण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 09:54 IST2025-06-02T09:54:02+5:302025-06-02T09:54:19+5:30
आमिर खाननं नुकतंच एका मुलाखतीत जुही चावलासोबत ७ वर्ष अबोला धरल्याचा खुलासा केला.

"जुहीसोबत ७ वर्षं बोललोच नाही" आमिर खानचा खुलासा, जाणून घ्या कधी मिटलं होतं मग भांडण?
Aamir Khan And Juhi Chawla Feud: 'द परफेक्शनिस्ट' म्हणून आमिर खान (Aamir Khan) ओळखला जातो. आमिर खानने त्याच्या कारकिर्दीमध्ये बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. सध्या आमिर हा 'सितारे जमीन पर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच, या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. हा चित्रपट येत्या २० जून २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या आमिर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच एका मुलाखतीमध्ये आमिरनं वैयक्तिक जीवनाविषयी अनेक खुलासा केला. त्यातलाच एक किस्सा सध्या सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. लोकप्रियतेचं शिखर गाठणारा आमिर हा एकेकाळी अभिनेत्री जुही चावला हिच्याशी बोलत नव्हता.
आमिर खान हा नुकतंच राज शमानीच्या पॉडकास्ट पोहचला होता. यावेळी आमिरने अभिनेत्री जूही चावला हिच्याशी झालेल्या वादावर भाष्य केलं. तब्बल ७ वर्ष तिच्याशी अबोल धरल्याचं त्यानं सांगितलं. तो म्हणाला, "मी फार लवकर दुखावतो आणि मग ज्याच्याशी माझं मतभेद झाले असतात, त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करतो. माझं आणि जूहीचं भांडण झालं आणि आम्ही ७ वर्षं एकमेकांशी बोललो नाही. अगदी एकाच प्रोजेक्टवर काम करत असतानाही. एका छोट्या गोष्टीवरून मतभेद झाला होता. तिनं खूप वेळा प्रयत्न केला, पण मी अजिबात तयार नव्हतो. रीना मला म्हणायची, 'कसं करू शकतोस असं? भेट तिला आणि वाद संपवं".
जूही चावला आणि आमिर खान यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री नेहमीच गाजली आहे. विशेषतः 'कयामत से कयामत तक' चित्रपटातून या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पण, १९९७ मध्ये 'इश्क' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांमध्ये वाद झाला होता. दरम्यान, आमिरने सांगितले की २००२ मध्ये रीनाशी घटस्फोट झाल्यानंतर जुहीसोबतचं भांडण संपवलं होतं.
किरण रावसोबतचा किस्सा
आमिरने त्याच्या स्वभावाबद्दल आणखी एक उदाहरण दिलं. "किरण रावसोबत एकदा माझं भांडण झालं होतं. मी तब्बल चार दिवस तिच्याशी काहीच बोललो नाही. ती खूप रडली होती. तेव्हा मला जाणवलं की, माझा हा स्वभाव खूप त्रासदायक ठरू शकतो".