'अशी ही बनवा बनवी' फेम शंतनूच्या निधनाच्या २१ वर्षांनी पत्नीनं सांगितलं इंडस्ट्री सोडण्यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 13:49 IST2025-09-06T13:48:47+5:302025-09-06T13:49:12+5:30

'अशी ही बनवा बनवी' फेम शंतनू उर्फ सिद्धार्थ रेची पत्नी शांती प्रियाने कास्टिंग काउच, चित्रपटसृष्टी सोडण्याचं कारण आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले.

21 years after the death of 'Ashi Hi Banwa Banwa' fame Shantanu aka Siddharth Ray, his wife revealed the reason behind leaving the industry | 'अशी ही बनवा बनवी' फेम शंतनूच्या निधनाच्या २१ वर्षांनी पत्नीनं सांगितलं इंडस्ट्री सोडण्यामागचं कारण

'अशी ही बनवा बनवी' फेम शंतनूच्या निधनाच्या २१ वर्षांनी पत्नीनं सांगितलं इंडस्ट्री सोडण्यामागचं कारण

बॉलिवूड अभिनेत्री शांती प्रिया(Shanti Priya)ने फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बॅड गर्ल' या तमीळ चित्रपटातून दमदार पुनरागमन केले. या चित्रपटात तिने 'मीनाक्षी' हे पात्र साकारले आणि त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. फार कमी लोकांना माहिती आहे की 'बॅड गर्ल' पूर्वी ती १९९४ मध्ये आलेल्या 'इक्के पे इक्का' या चित्रपटात शेवटची दिसली होती. जरी या काळात ती काही टीव्ही मालिकांमध्ये दिसली असली, तरी तिला अपेक्षित यश मिळाले नाही. या सगळ्या गोष्टी असूनही, तिने चित्रपटांमध्ये ज्या पद्धतीने पुनरागमन केले ते खरोखरच कौतुकास्पद आहे. 

शांती प्रियाने नवभारत टाइम्स ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत त्यांचा प्रवास शेअर केला आहे. ती म्हणाली की, ''गेल्या काही वर्षांत चित्रपटसृष्टीत अनेक बदल झाले आहेत. इंडस्ट्रीतील अभिनेत्रींकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे आणि आता त्यांना अधिक आदर दिला जातो. अभिनेत्रींना त्यांच्या इच्छेनुसार काम करण्याची संधी मिळत आहे. महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. या सगळ्याचा चांगला परिणामही दिसून येत आहे. मला इंडस्ट्रीत काहीही नकारात्मक दिसले नाही. मात्र, आता सोशल मीडियामुळे सर्वकाही खूप लवकर बाहेर येते. हे असे व्हायला नको, पण सध्या असे खूप घडत आहे.''

अभिनेत्री शांती प्रियाने कास्टिंग काउच, चित्रपटसृष्टी सोडण्याचं कारण आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले. ती म्हणाली की, ''कास्टिंग काउच सर्वच ठिकाणी आहे. हे होतच आहे. तुम्हाला किती खाली जायचे आहे, याचा विचार तुम्ही स्वतः करू शकता. जर तुम्हाला योग्य वाटत असेल, तर तुम्ही ते करू शकता. कोणीही तुम्हाला जबरदस्ती करत नाही. लोक अनेक वर्षांनंतर येऊन याबद्दल सांगतात, हे मला कळत नाही. इतक्या दिवसांनंतर तुम्हाला हे कळले का? जर तुम्हाला माहीत आहे की तो तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी बोलवत आहे, तर तुम्ही तिथे का जाता? माझी बहीण आणि आई असल्यामुळे मला कोणीही कधी काही बोलण्याची हिंमत केली नाही. हे केवळ ग्लॅमर इंडस्ट्रीतच नाही, तर सर्वच ठिकाणी घडतं.''

पतीमुळे इंडस्ट्री सोडली नाही
लग्नानंतर सिनेइंडस्ट्री का सोडली, या प्रश्नावर ती म्हणाली की, ''बिचाऱ्या माझ्या पतीचा माझा काम सोडण्याशी काहीही संबंध नाही. ते सुद्धा इंडस्ट्रीतूनच होते, ते मला काम सोडायला का सांगतील? ते स्वतः फिल्मी कुटुंबातून आले आहेत, ते मला असं का म्हणतील? कृपया त्यांना काहीही बोलू नका. हा माझा स्वतःचा निर्णय होता. लग्नानंतर मला काम करायचं नव्हतं. मला आयुष्य जगायचं होतं आणि कुटुंबासोबत वेळ घालवायचा होता.''

पुन्हा प्रेम होऊ शकतं
''मी माझ्या आई आणि सासूकडून खूप काही शिकले,'' असे तिने सांगितले. पुन्हा प्रेमात पडण्याबद्दल तिने सांगितले की, ''प्रेम कधीही होऊ शकतं. सुरुवातीला मी माझ्या कामात खूप व्यग्र होते. लग्नानंतर मला एक चांगली पत्नी, आई आणि सून व्हायचे होते. मी त्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित केले. पण प्रेम कधीही होऊ शकतं. जेव्हा काही होईल, तेव्हा पाहू. मी प्रेमासाठी तयार आहे. सगळ्यांची नाती जपताना मी कुठेतरी स्वतःला हरवून बसले होते.''

Web Title: 21 years after the death of 'Ashi Hi Banwa Banwa' fame Shantanu aka Siddharth Ray, his wife revealed the reason behind leaving the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.