Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:54 IST2025-06-13T15:53:28+5:302025-06-13T15:54:16+5:30
Amitabh Bachchan on Air India Plane Crash: अमिताभ बच्चन यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर एक पोस्ट केली. पण बिग बींना यामुळे चाहत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला

Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
अहमदाबादमध्येविमान दुर्घटनेमुळे भीषण दुर्घटना झाली. या दुर्घटनेत विमानातील प्रवाश्यांचा मृत्यू झाला. शिवाय अनेक कुटुंबांनी जवळचा व्यक्ती या अपघातात गमावल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. जगभरातील सामान्य नागरीकांपासून राजकारणी आणि सेलिब्रिटी या दुर्घटनेवर हळहळ व्यक्त करत आहेत. अशातच बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेवर सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. पण यामुळे बिग बींना नेटकऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला आहे.
अहमदाबाद दुर्घटनेवर बिग बींची पोस्ट
बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेवर त्यांच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते लिहितात, "अरे देवा! अरे देवा! अरे देवा. मी स्तब्ध झालोय. सुन्न झालोय. ईश्वराची कृपा. मनापासून सर्वांसाठी प्रार्थना", अशा शब्दात अमिताभ यांनी पोस्ट लिहिली आहे. अमिताभ यांची पोस्ट येताच नेटकऱ्यांनी मात्र बिग बींना चांगलंच धारेवर धरलं आहे. त्यामुळे बिग बींना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे.
T 5410 - हे भगवान ! हे भगवान ! हे भगवान !
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 13, 2025
स्तब्ध ! सुन्न !
ईश्वर कृपा ! हृदय से प्रार्थनाएँ !
🙏
बिग बींवर नेटकऱ्यांची नाराजी का?
अहमदाबाद विमान अपघाताची दुर्घटना झाल्यावर २४ तासांनी बिग बींनी ही पोस्ट लिहिल्याने नेटकऱ्यांनी त्यांना फटकारलं आहे. इतकी मोठी दुर्घटना काल घडली पण तुम्ही आज पोस्ट करताय, अशा शब्दात अमिताभ यांना नेटकऱ्यांनी सुनावलं आहे. त्यामुळे अहमदाबाद विमान दुर्घटना झाल्यावर २४ तासांनी बिग बींनी पोस्ट केल्याने नेटकऱ्यांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत आतापर्यंत २६५ लोकांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना इतकी भयानक होती की, विमानाचे तुकडेतुकडे झाले. याशिवाय प्रवाशांनीही जागीच त्यांचा जीव गमावला. एअर इंडियाचं हे विमान २४२ प्रवाशांना घेऊन लंडनकडे उड्डाण करत होतं. टेक ऑफ केल्यानंतर पुढील काहीच क्षणांमध्ये हे विमान क्रॅश झालं. या मोठ्या दुर्घटनेतून एक व्यक्ती बचावला असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये भेट दिली आणि त्याची विचारपूस केली.