मुलीच्या आग्रहाखातर मनोज तिवारींनी लॉकडाऊनमध्ये केले दुसरे लग्न, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 11:19 AM2021-01-03T11:19:45+5:302021-01-03T12:34:28+5:30

30 डिसेंबरला मनोज तिवारी यांनी कन्यारत्न झाल्याची माहिती दिली तेव्हा सगळेच चकित झाले होते.

Manoj Tiwari Reveals How His Elder Daughter Asked Him To Marry Again | मुलीच्या आग्रहाखातर मनोज तिवारींनी लॉकडाऊनमध्ये केले दुसरे लग्न, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर केला खुलासा

मुलीच्या आग्रहाखातर मनोज तिवारींनी लॉकडाऊनमध्ये केले दुसरे लग्न, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर केला खुलासा

googlenewsNext
ठळक मुद्देमीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री श्वेता तिवारीमुळे मनोज तिवारींची पहिली पत्नी नाराज होती. तिच्यामुळेच तिने मनोज यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

गत 30 डिसेंबरला भोजपुरी सुपरस्टार व खासदार मनोज तिवारी यांनी कन्यारत्न झाल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. एक बरीच मोठी मुलगी असताना मनोज यांना  इतक्या वर्षांनंतर दुसरी मुलगी झालेले पाहून अनेकांना आश्चर्यही वाटले होते. अखेर मनोज तिवारी यांनीच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर त्यांच्या दुसऱ्या लग्नाचाही खुलासा झाला आहे. होय, तेच दुसरे लग्न जे मनोज तिवारींनी आत्तापर्यंत लपवून ठेवले होते.

पहिल्या पत्नीला दिलेल्या घटस्फोटानंतर 8 वर्षांनी गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच एप्रिल 2020 मध्ये मनोज तिवारींनी सुरभी तिवारीशी लग्न केले. याच सुरभीपासून त्यांना दुसरी मुलगी झाली. सुरभी मनोज यांची सेक्रेटरी होती आणि ती एक चांगली गायिकाही आहे. 
मनोज तिवारींनी अखेर या लग्नाचा खुलासा केला.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, ‘ माझी मुलगी जिया (पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी) हिच्यामुळेच मी  लग्न केले. जिया आणि सुरभी चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांचे चांगले जमते. किती दिवस एकटे राहणार सुरभीशी लग्न करा, असे जियानेच मला म्हटले. त्यामुळे मी दुसरे लग्न केले.

पहिले लग्न का मोडले, याबद्दल मी काहीही बोलू इच्छित नाही आणि मला त्याची आठवणही काढायची नाही. वेगळे होण्याचा निर्णय तिचा होता. माझी मुलगी तिच्या आईबरोबर राहाते. महिन्यात एक-दोनदा माझी आणि मुलीची भेट होते. माण्या मुलीच्या आनंदातच मी आनंद मानतो. माझी मुलगी आणि माझी पूर्व पत्नी आनंदी राहो हीच माझी इच्छा आहे, असेही मनोज म्हणाले.
 2004 मध्ये मनोज तिवारी यांनी ‘ससुरा बड़ा पइसावाला’ हा भोजपुरी सिनेमा केला. हा सिनेमा सुपरहिट झाला होता. त्यानंतर त्यांनी अनेक हिट सिनेमे दिलेत. सिनेमात येण्यापूर्वीच म्हणजे 1999 मध्ये त्यांनी राणी तिवारीसोबत लग्न केले होते. त्यांना जिया नावाची एक मुलगीही आहे. मनोज यांनी 13 वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतला. मनोज आता 50 वर्षांचे आहेत. 

श्वेता तिवारींमुळे घटस्फोट?

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री श्वेता तिवारीमुळे मनोज तिवारींची पहिली पत्नी नाराज होती. तिच्यामुळेच तिने मनोज यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. बिग बॉस 4 मध्ये मनोज तिवारी व श्वेता तिवारी स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. यादरम्यान त्यांच्यातील जवळीकीच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या.
रिअल लाईफमध्येही मनोज व श्वेता चांगले मित्र आहेत. दोघांनी एकत्र भोजपुरी सिनेमातही काम केले आहे. बिग बॉसच्या घरातील मनोज व श्वेता यांची जवळीक मनोज यांच्या पत्नी राणी यांना अजिबात आवडली नव्हती आणि म्हणून तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला.

Web Title: Manoj Tiwari Reveals How His Elder Daughter Asked Him To Marry Again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.