जावेद अख्तर यांनी कंगनावर ठोकला मानहानीचा दावा, अभिनेत्रीने केला होता गंभीर आरोप...

By अमित इंगोले | Published: November 3, 2020 02:06 PM2020-11-03T14:06:20+5:302020-11-03T14:15:28+5:30

कंगनाने दावा केला होता की, अख्तर यांनी घरी बोलवून धमकावत हृतिक रोशनला माफी मागण्यास सांगितले होते.

Javed Akhtar sues defamation against Kangana Ranaut | जावेद अख्तर यांनी कंगनावर ठोकला मानहानीचा दावा, अभिनेत्रीने केला होता गंभीर आरोप...

जावेद अख्तर यांनी कंगनावर ठोकला मानहानीचा दावा, अभिनेत्रीने केला होता गंभीर आरोप...

googlenewsNext

कंगना रणौतच्या अडचणी कमी होण्याचं नावच घेत नाहीयेत. गेल्या महिन्यात तिच्या विरोधात तुमकूर कर्नाटकमद्ये एक आणि मुंबईत दोन केसेस दाखल झाल्या होत्या. आता प्रसिद्ध गीतकार-लेखक जावेद अख्तर यांनी तिच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकलाय. एका रिपोर्टनुसार, अख्तर यांनी कंगनाच्या एका वक्तव्यावरून ही केस दाखल केली आहे. कंगनाने दावा केला होता की, अख्तर यांनी घरी बोलवून धमकावत हृतिक रोशनला माफी मागण्यास सांगितले होते.

जावेद अख्तर यांचा दावा, धमकी दिलीच नाही...

स्पॉटबॉयच्या एका रिपोर्टनुसार, जावेद अख्तर यांच्याशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने लिहिले आहे की, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची धमकी दिली गेली नव्हती. जावेद साहब स्वभावाने फार संवेदनशील आहेत. पण हे सगळं फार दिवसांपासून सुरू होतं. आता जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. (यूट्यूबर ध्रुव राठीवर भडकली कंगना रणौत, म्हणाली - 'तुला तुरूंगात पाठवू शकते')

यात पुढे लिहिले आहे की, केस कोर्टात सुरू आहे आणि जावेद साहब मोठ्या लढाईसाठी तयाकर आहेत. कोर्टाबाहेर सेटलमेंट करण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे आता कंगनाच्या अडचणी आणखीन वाढणार आहेत.

८ महिन्यांआधी कंगनाच्या मॅनेजर केलं होतं ट्विट

८ महिन्यांआधी कंगनाची बहीण आणि मॅनेजर रंगोली चंदेलने ट्विट करून जावेद अख्तर यांनी कंगनाला धमकावल्याचा आरोप केला होता. तिने लिहिले होते की, 'जावेद अख्तरजी यांनी घरी बोलवलं आणि धमकी दिली की, हृतिक रोशनला माफी माग. महेश भट्ट यांनीही तिच्यावर चप्पल फेकली होती. कारण तिने त्यांच्या सुसाइड बॉम्बर सिनेमात काम करण्यास नकार दिला होता'. (जस्टिन ट्रूडो उत्तर द्या...! आता कंगना राणौत थेट कॅनडाच्या पंतप्रधानांवर बरसली)

दरम्यान, रंगोलीचं हे ट्विट तेव्हा समोर आलं होतं जेव्हा जावेद अख्तर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, 'फासीवाद्यांच्या डोक्यावर शिंग नसतात. फासीवादी फक्त एक विचार आहे. जेव्हा आपण दुसऱ्याचा व्देष करू लागतो तेव्हा तो फासीवाद असतो'.

काय आहे हृतिक कंगनाचा वाद

कंगना हृतिकसोबत रिलेशनशिपमध्ये होती असं बोललं जातं. ब्रेकअपनंतर दोघांचा वाद चांगलाच चर्चेत होता. २०१६ मध्ये एका कार्यक्रमात कंगनाने हृतिकला सिली एक्स असं म्हटलं होतं. आणि दावा केला होता की, पुरावे म्हणून तिच्याकडे मेल आहेत जे हृतिकने तिला रिलेशनशिपदरम्यान केले होते. यावरून हृतिकने कंगना विरोधात मुंबईतील क्राइम ब्रॅंचमध्ये तक्रार दाखल केली होती.

पण नंतर ही केस निकालाविनाच बंद करण्यात आली होती. त्यावेळी मुंबई क्राइम ब्रॅंचचे जॉइंट कमिश्नर राहिलेले संजय सक्सेना म्हणाले होते की, हृतिकच्या आयडीवरून कोणत्याही प्रकारचे मेल मिळाले नाहीत. तसेच मेल सर्व्हर यूएसमध्ये लोकेट असल्याचं सांगितलं होतं. पण हे मेल कुणी पाठवले हे समजू शकलं नव्हतं.
 

Web Title: Javed Akhtar sues defamation against Kangana Ranaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.