सोलापूर शहरात पाणीबाणी, आता सहा दिवसानंतर होणार पुरवठा

By राकेश कदम | Published: May 9, 2024 08:58 PM2024-05-09T20:58:14+5:302024-05-09T20:58:22+5:30

जपून वापर आवश्यक : प्रशासनाचे आवाहन

Water shortage in Solapur city, now supply will be after six days | सोलापूर शहरात पाणीबाणी, आता सहा दिवसानंतर होणार पुरवठा

सोलापूर शहरात पाणीबाणी, आता सहा दिवसानंतर होणार पुरवठा

सोलापूर : उजनी धरण आणि औज बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी संपूर्ण शहरात रविवार (१२ मे) पासून पाच दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय गुरुवारी सायंकाळी घेतला. शहर असो हद्दवाढ भागातील नळांना आता सहा दिवसानंतरच पाणी येईल. पाउस हाेईपर्यंत पुढील अडीचे महिने ही परिस्थिती राहणार आहे.

शहराला उजनी ते सोलापूर जलवाहिनी, टाकळी ते सोरेगाव योजनेतून पाणी पुरवठा होतो. उजनी धरणाची पाणी पातळी गुरुवारी वजा ४३ टक्के होती. शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी धरणातून शुक्रवारी भीमा नदीत पाणी सोडण्यात येईल. हे पाणी २० मे पर्यंत औज बंधाऱ्यात पोहोचणार आहे. हे पाणी सोडल्यामुळे धरणाची पातळी वजा ५० टक्क्याहून कमी होईल. 

दुसरीकडे धरणाची पाणी पातळी कमी झाल्यामुळे पालिकेला उजनी पंपगृहावर तिबार पंपिंग करावे लागेल. या दोन्ही योजनांवर परिणाम होणार असल्यामुळे शहरात सरसकट सहा दिवसानंतर पाणी देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला.
 

Web Title: Water shortage in Solapur city, now supply will be after six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.