सोहेल-सीमानंतर सलमान-आयुषमध्ये वादाची ठिणगी; 'कभी ईद कभी दिवाली'मधून आयुष बाहेर?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 02:05 PM2022-05-23T14:05:52+5:302022-05-23T14:07:21+5:30

Salman khan: 'कभी ईद कभी दिवाली' हा चित्रपट आयुषने अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर आयुषसोबत जहीर इक्बाल यालादेखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 

salman khan and brother in law aayush sharma has break the relation then out of the film kabhi eid kabhi diwali | सोहेल-सीमानंतर सलमान-आयुषमध्ये वादाची ठिणगी; 'कभी ईद कभी दिवाली'मधून आयुष बाहेर?

सोहेल-सीमानंतर सलमान-आयुषमध्ये वादाची ठिणगी; 'कभी ईद कभी दिवाली'मधून आयुष बाहेर?

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये मोठं प्रस्थ आणि नावाजलेलं कुटुंब म्हणजे खान परिवार. सोशल मीडियावर या खानदानाची कायम चर्चा सुरु असते. सध्या हे कुटुंब घरातल्यांमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांमुळे चर्चेत येत आहे. ४ वर्षांपूर्वी अभिनेता अरबाज खान (arbaaz khan) आणि मलायका अरोरा(malaika arora) यांनी घटस्फोट घेतला. त्यांच्याच पाठोपाठ लव्ह मॅरेज केलेल्या सोहेल खान आणि सीमा खान हे घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आहेत. इतकंच नाही तर आता अभिनेता सलमान खान (salman khan)आणि त्याचा मेहुणा आयुष शर्मा (aayush sharma) यांच्यातही वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळेच आता 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटातून आयुषने काढता पाय घेतला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सलमानच्या आगामी कभी ईद कभी दिवाली या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात पंजाबी अभिनेत्री शहनाज गिल महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असून तिच्यासोबत आयुष शर्मा आणि जहीर इक्बालदेखील स्क्रीन शेअर करणार आहेत. मात्र, आता सलमान आणि आयुष यांच्यात मदभेद निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यामुळे आयुषने हा चित्रपट अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर आयुषसोबत जहीर इक्बाल यालादेखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, आयुष, इक्बाल आणि सलमान यांच्यात काही मतभेद निर्माण झाल्यामुळे या अभिनेत्यांनी चित्रपट मध्यावर सोडण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झालं असून आयुषने अनेक भागांचं चित्रीकरणही केलं आहे. मात्र, निर्माण झालेल्या मतभेदांमुळे त्याने चित्रपट अर्ध्यावर सोडला.

दरम्यान, आयुष हा सलमानच्या धाकट्या बहिणीचा आर्पिता खानचा नवरा आहे. आयुषला सलमाननेच बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं आहे. लवयात्री या चित्रपटातून त्याने कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तो सलमानच्या अंतिम या चित्रपटातही झळकला. मात्र, आता सलमानच्या तिसऱ्या चित्रपटातून त्याने काढता पाय घेतला आहे.
 

Web Title: salman khan and brother in law aayush sharma has break the relation then out of the film kabhi eid kabhi diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.