पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं हा देशाचा अपमान; CM शिंदेंचा उबाठा गटावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 05:47 PM2024-03-21T17:47:11+5:302024-03-21T17:47:50+5:30

बुलढाणाच्या सभेत राऊतांनी मोदी नको, औरंगजेब म्हणा असं विधान केले. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांवर प्रत्युत्तर दिले. 

Calling the PM as Aurangzeb is an insult to the country; CM Eknath Shinde targets Sanjay Raut, Uddhav Thackeray | पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं हा देशाचा अपमान; CM शिंदेंचा उबाठा गटावर निशाणा

पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं हा देशाचा अपमान; CM शिंदेंचा उबाठा गटावर निशाणा

मुंबई - Eknath Shinde on Uddhav Thackeray ( Marathi News ) देशभक्त आणि राष्ट्रभक्त या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला नव्या उंचीवर नेले. बाळासाहेबांचे जे स्वप्न होते ते त्यांनी पूर्ण केले. अशा पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं म्हणजे हा देशाचा अपमान आहे. हा देशद्रोह आहे. खरेतर औरंगजेबी वृत्ती, ज्याने बापाला सोडलं नाही, भावाला सोडलं नाही, नातेवाईकांनाही सोडलं नाही. हीच वृत्ती या लोकांनी दाखवली ती महाराष्ट्राने पाहिली. याचे उत्तर महाराष्ट्रातील जनता मतपेटीतून देईल असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे लगावला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मोदींच्या अपमानाचा बदला जनता मतपेटीतून घेईल. कणखर आणि धाडसी गृहमंत्र्यांनी मोदींच्या नेतृत्वात कलम ३७० हटवले. जे स्वप्नवत वाटत होते. शेपटी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला यांना आवडत होते. म्हणून शेपटीवर जास्त प्रेम आहे. वेळेप्रसंगी शेपूट घालणारे, दिल्लीत लोटांगण घालणारे आणि नोटीस आली म्हणून घाम फुटणारे हे कोण आहेत? खुर्चीसाठी, सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रिपदासाठी कोणी शेपूट घातली हे जनतेला माहिती आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच राज ठाकरेंसोबत चर्चा झाली आहे. यापुढेही चर्चा होईल. योग्य वेळी योग्य तो निर्णय होईल. समविचारी पक्षांची युती आणि सरकारच्या कामावर विश्वास ठेवून अनेकजण आमच्यासोबत येतायेत. लोकसभा निवडणुकीसाठी आजची बैठक महत्त्वाची होती. राज्यात ४८ जागा आहेत. त्यात ४५ हून अधिक जागा जिंकायच्या आहेत. मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी महाराष्ट्रातून त्यांना ताकद द्यायची आहे त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

दरम्यान, महायुतीत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. योग्य वेळी निर्णय होईल. महाविकास आघाडी सगळा तिढा आहे. कुणीही कुणासोबत नाही. शिवाजी पार्कवर सभा झाली तिथून बाळासाहेब ठाकरे देशाला मार्गदर्शन करायचे तिथे सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना आणलं तोच काळा दिवस होता. इंडिया आघाडी बिखरली आहे. उद्धव ठाकरेंना घरी बसण्याची सवय आहे. त्यामुळे जनता त्यांना घरीच बसवेल असा टोलाही शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

Web Title: Calling the PM as Aurangzeb is an insult to the country; CM Eknath Shinde targets Sanjay Raut, Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.