आणखी एका टीव्ही कपलचा झाला घटस्फोट, लग्नाच्या १० वर्षानंतर घेतला दोघांनीही मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 12:42 PM2020-12-17T12:42:30+5:302020-12-17T12:49:12+5:30

पूजा गौरनेच सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटोची माहिती दिली आहे. पोस्ट शेअर करत तिने त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिल्याचे जाहीर करत म्हटले की, १० वर्षापासून असलेले नाते आज संपले आहे.

Shocking 'We've Decided to Part Ways' Actress Pooja Gor Announces | आणखी एका टीव्ही कपलचा झाला घटस्फोट, लग्नाच्या १० वर्षानंतर घेतला दोघांनीही मोठा निर्णय

आणखी एका टीव्ही कपलचा झाला घटस्फोट, लग्नाच्या १० वर्षानंतर घेतला दोघांनीही मोठा निर्णय

googlenewsNext

टीव्ही अभिनेत्री पूजा गौरने 'मन की आवाज प्रतिज्ञा', 'कितनी मोहोब्बत है', 'सपना बाबुल का... बिदाई', 'मायके से बंधी डोर', 'ये रिश्ता क्या कहलाता है' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते.  'मन की आवाज प्रतिज्ञा' या मालिकेतील 'प्रतिज्ञा या भूमिकेमुळे ती चांगलीच नावारूपाला आली होती. पूजा गौरने अभिनेता राज सिंह लग्न केले होते.

लग्नानंतर या दोघांचे नातं घट्ट होण्यापेक्षा वेगळ्याच वळणावर जात होते. लग्नानंतर काहीच वर्षात या दोघांनाही एकमेकांसोबत आनंदी नसल्याचे जाणवले आणि अखेर घटस्फोट घेत वेगळे झाले आहेत. खुद्द पूजानेच सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटोची माहिती दिली आहे.

पोस्ट शेअर करत तिने त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिल्याचे जाहीर करत म्हटले की, १० वर्षापासून असलेले नाते आज संपले आहे. गेल्या काही दिवसांपासून आमच्या वैवाहिक आयुष्याविषयी चर्चा रंगत होत्या. दोघांनीही यावर कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिले नव्हते. त्यामुळे आज ही योग्य वेळ आहे, मन मोकळं करण्याची. राज नेहमीच माझा चांगला मित्र असणार आहे. नेहमीच त्याच्याविषयी मला एक आदर होता, तसाच आदर - सन्मान कायम असणार असल्याचे तिने म्हटले आहे.

पूजा आणि राज 'कोई आने को है' मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. बघता- बघता दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पूजा आणि राज छोट्या पडद्यावरील रसिकांची आवडती जोडी बनली होती. दोघांनाही एकमेकांच्या आवडी-निवडी समजल्या, त्यामुळे दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयामुळे रसिकही खूप खूश होते. 

मात्र पूजाचा कुटुंबियांचा दोघांच्या लग्नाला विरोध होता. पूजा तिच्या निर्णयावर ठाम होती. शेवटी कुटुंबियांनीही या लग्नाला परवानगी दिली आणि दोघांचे लग्न पार पडले. लग्नानतर दोघांच्या नात्यात हवे तसे बंध निर्माण झाले नाही.

वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाल्यामुळे पूजा आणि राज दोघांनीही घटस्फोट घेतल्याचे जाहीर केेल आहे. एकमेकांपासून वेगळा होण्याचा निर्णय दोघांनी सहमतीने घेतला आहे. लग्नानंतर १० वर्ष त्यांचे हे नाते टिकले. रसिकांनी डोक्यावर घेतलेल्या जोडीमध्ये अशाप्रकारे अचानक दुरावा निर्माण झाल्याने रसिक दुःखी झाले आहेत.


 

Web Title: Shocking 'We've Decided to Part Ways' Actress Pooja Gor Announces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.