बॉयफ्रेंड मुस्लीम असूनही निक्कीनं घेतला मोठा निर्णय, म्हणाली "अल्लाहच्या नावावर लाखो..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 11:24 IST2025-06-15T11:24:35+5:302025-06-15T11:24:53+5:30
निक्कीने सांगितलंय की हा निर्णय तिने स्वतःसाठी घेतला आहे, याचा तिच्या जोडीदाराच्या धार्मिक श्रद्धेशी काहीही संबंध नाही.

बॉयफ्रेंड मुस्लीम असूनही निक्कीनं घेतला मोठा निर्णय, म्हणाली "अल्लाहच्या नावावर लाखो..."
ग्लॅमरस लूक, बोल्ड स्वभाव आणि बिनधास्त असलेली 'बिग बॉस' फेम निक्की तांबोळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारण वेगळं आहे. अभिनय आणि स्टाईलसोबतच स्वतःच्या आयुष्यात एक मोठा आणि ठाम निर्णय घेऊन तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. निक्की आता पूर्णपणे व्हिगन म्हणजेच शुद्ध शाकाहारी झाली आहे. अलिकडेच ईदच्या दिवशी तिने सोशल मीडियावरून याची अधिकृत घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अरबाज पटेलला डेट करत आहे. निक्कीने सांगितलंय की हा निर्णय तिने स्वतःसाठी घेतला आहे, याचा तिच्या जोडीदाराच्या धार्मिक श्रद्धेशी काहीही संबंध नाही.
निक्कीने तिच्या इंस्टाग्रामवर 'Go Vegan' अशी एक पोस्ट शेअर केली. त्यात ती म्हणते, "व्हिगन डाएट नव्हे, हा मनाने घेतलेला निर्णय आहे. कारण मला या जगात जो बदल पाहायचा आहे, त्याची सुरुवात स्वतःपासून करायची आहे". व्हिगन होण्याच्या निर्णयाबद्दल निक्की म्हणाली, "मी खूप काळापासून याबद्दल विचार करत होते आणि अखेर माझ्या अंतर्मनानं मला हा निर्णय घेण्यासाठी प्रेरित केलं. आता मला हे स्पष्टपणे जाणवतं की, माझ्या जगण्यासाठी कोणत्याही प्राण्याचा मृत्यू होण्याची गरज नाही" यासंदर्भात इ-टाइम्सने वृत्त दिलंय.
बकरी ईदला प्राण्यांची कुर्बानी दिली जाणं हे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करत असल्याचं निक्कीनं म्हटलं."मी बकरी ईद सणाच्या पूर्णपणे विरोधात आहे. बकऱ्यांचा बळी दिला जातो. हा विचारही आता मला सहन होत नाही. मी व्हिगन होण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आता मला खूप शांत वाटत आहे", असंही तिनं नमूद केलं.
निक्की सध्या अभिनेता अरबाज पटेलला डेट करत आहे, जो मुस्लिम आहे. त्यामुळे तिच्या या निर्णयाला धार्मिक संदर्भ जोडला जाऊ नये, असंही निक्कीनं एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलंय. "हा निर्णय मी माझ्यासाठी घेतला आहे. याचा माझ्या जोडीदाराच्या धार्मिक श्रद्धेशी काहीही संबंध नाही. माझं नातं किंवा डेटिंग लाइफ ठरवत नाही की मी काय खावं. माझं व्यक्तिमत्त्व आणि स्वतःशी असलेलं नातं हेच माझं प्राधान्य आहे आणि त्यावर मी कोणतीही तडजोड करणार नाही. धर्म आणि अन्ननिवडी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, आणि लोकांनी त्या गोंधळून टाकू नयेत. मी नेहमीच माझ्या मनाचा आणि अंतःकरणाचा आवाज ऐकते आणि तसंच ऐकत राहीन".